माजी मुख्यमंत्र्यांचा बंडाचा इशारा अन् 24 तासांतच काँग्रेस हाय कमांडचं दिल्लीचं निमंत्रण

उत्तराखंडचे (Uttarakhand) काँग्रेस (Congress) नेते हरीश रावत (Harish Rawat) यांनी पक्ष सोडण्याचे थेट संकेत दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Congress

Congress

Sarkarnama

नवी दिल्ली : मागील काही दिवसांत काँग्रेसला (Congress) अनेक धक्के बसले आहेत. आता आणखी एक नवे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे. गांधी कुटुंबीयांशी अत्यंत जवळीक असलेले ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे (Uttarakhand) माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांनी पक्ष सोडण्याचे थेट संकेत दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी 24 तासांतच रावत यांना तातडीने दिल्लीला पाचारण केले आहे.

रावत यांच्याशी उद्या (ता.24) पक्ष नेतृत्व चर्चा करणार आहे. उत्तराखंड काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी रावत यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल आणि पक्षाचे नेते यशपाल आर्य यांनाही दिल्लीला बोलावण्यात आले आहे. या बैठकीत अंतर्गत मतभेदांवर तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यासाठी रावत यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. पक्षांच्या बैठकांसह भाजपच्या (BJP) आमदारांना पक्षात घेण्याची रणनीतीही त्यांनी बनविली होती. पण त्यांनी अचानक पक्षावर ट्विटबॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली. रावत यांना त्यांच्या या ट्विटबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, वेळ येईल त्यावेळी सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर मांडेन. मी तुमच्याशी नाही तर दुसऱ्या कुणाशी बोलणार? मी तुम्हाला कॉल करेन. तोपर्यंत तुम्ही केवळ मजा बघा.

<div class="paragraphs"><p>Congress </p></div>
आता पूर्वीचा भाजप राहिला नाही! आमदाराचा सात नगरसेवकांसह पक्षाला रामराम

मनात खूप चलबिचल सुरू असल्याचे सांगत नव्या वर्षात कदाचित रस्ता सापडेल, असे रावत यांनी म्हटल्याने ते काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावत यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'न दैन्यं न पलायनम्' या कविताचा आधार घेतला होता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, पुन्हा एकदा मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज येत आहे, 'न दैन्यं न पलायनम्' (कोणतीही दया नको, आव्हानांना घाबरून पळायचे नाही, त्याचा सामना करायचा). खूप चलबिचल सुरू आहे, कदाचित नवे वर्ष रस्ता दाखवेल. भगवान केदारनाथ मला या स्थितीत मार्गदर्शन करतील, याचा मला विश्वास आहे.

<div class="paragraphs"><p>Congress </p></div>
भाजपला मोठा धक्का! आमदारानं तडकाफडकी राजीनामा देऊन धरली काँग्रेसची वाट

निवडणूकरुपी समुद्रात पोहायचे आहे. पण संघटना ठिकठिकाणी सहकार्याचा हात पुढे करण्याऐवजी तोंड फिरवून उभी राहत आहे किंवा नकारात्मक भूमिका पार पाडत आहे. ज्या समुद्रात पोहायचे आहे, त्यात सत्तेने अनेक मगरी सोडल्या आहेत. ज्यांच्या आदेशानुसार पोहायचे आहे, त्यांचे हस्तक माझे हात-पाय बांधत आहेत. मनात अनेक विचार येत आहेत की, हरीश रावत आता बास, खुप पोहलो, आता विश्रांतीची वेळ आली आहे, असे रावत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com