पद्मभूषणवरून सुरू असलेल्या गदारोळावर मौन सोडून आझाद म्हणाले, हा तर खोडसाळपणा!

केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यावरून गदारोळ सुरू झाला आहे.
Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi Azad

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली असून, यावरून गदारोळ सुरू झाला आहे. काही जणांनी पद्म पुरस्कार नाकारला असून, काहींना तो मिळाल्यावरून वाद सुरू झाला आहे. यात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना पद्मभूषण मिळाल्यावरून चर्चेला उधाण आले आहे. आझाद यांनीच अखेर यावर मौन सोडून खुलासा केला आहे.

पद्मभूषण मिळाल्यानंतर आझाद यांचे कौतुक होत असतानाही त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. त्यांनी ट्विटरवरील त्यांची माहिती बदलल्याची चर्चाही सुरू झाली आहे. यावर आझाद यांनी हा सर्व खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही जणांकडून जाणीवपूर्वक खोडसाळपणे माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. गोंधळ निर्माण करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. माझ्या ट्विटर प्रोफाईलमधील कोणतीही माहिती मी काढून टाकलेली नाही अथवा त्यात कोणतीही भर टाकलेली नाही. माझा प्रोफाईल आधी होता तसाच आहे.

Ghulam Nabi Azad
आझादांना पद्मभूषण जाहीर होताच सिब्बल म्हणाले, हे तर दुर्दैव..!

रमेश यांचा आझाद यांच्यावर निशाणा

दरम्यान, आझाद यांचे सहकारी जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म भूषण पुरस्कार जाहीर नाकारला आहे. पुरस्काराबाबत आपल्याला कळवलेच नसल्याचे कारण देत त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. हेच निमित्त साधत जयराम रमेश यांनी आझादांना लक्ष्य केलं. भट्टाचार्य यांनी पुरस्कार नाकारल्याचे एक ट्विट रिट्विट करत रमेश यांनी म्हटलं आहे की, 'योग्य पाऊल उचललं. त्यांना आझाद राहायचं आहे, गुलाम नव्हे.'

Ghulam Nabi Azad
माय मेंटॉर, माय हिरो, माय फादर! अदर पूनावालांची भावनिक पोस्ट

संध्या मुखर्जी यांनीही नाकारला पुरस्कार

90 वर्षांच्या प्रसिध्द बंगाली गायिकेने पुरस्कार नाकारल्याचे समोर आले आहे. बंगालमधील प्रसिध्द गायिका संध्या मुखर्जी यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार होता. पण त्यांनी हा पुरस्कार नाकारला. पद्म पुरस्कार नाकारणारे दोघेही बंगालमधील आहेत. मुखर्जी यांच्या कन्या सौमी सेनगुप्ता यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. आईनेच हा पुरस्कार स्वत:हून नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. पण आता या पुरस्कारांवरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com