Loksabha Election Voting : दुसऱ्या टप्प्यातही देशभरातील 88 जागांवर 2019च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला!

Lok Sabha Election Polling : जाणून घ्या, सर्वाधिक जास्त आणि सर्वाधिक कमी मतदान कुठे झालं?
Voting
VotingSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी 13 राज्यांमधील एकूण 88 जागांवर पार पडले. परंतु निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. या टप्प्यात एकूण 61.40 टक्के मतदान झाले.

या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांसाठी आणि बिहारमधील 5 जागांसाठी मतदान झाले. तर केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, मध्य प्रदेशातील 6, आसाममधील 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 3, मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी 1 जागांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून(Rahul Gandhi) ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Voting
Rahul Gandhi News : राहुल गांधी अमेठीतून लढणार? स्वागताची जोरदार तयारी सुरू

मतदानाची आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक 78 टक्के मतदान त्रिपुरामध्ये आणि सर्वात कमी 53.20 टक्के उत्तर प्रदेशात झाले. याशिवाय मणिपूर - 77.20 टक्के, छत्तीसगड - 72.50 टक्के, पश्चिम बंगाल -71.80, आसाम - 70.7 टक्के, जम्मू आणि काश्मीर - 67.40 टक्के, केरळ - 65 टक्के, कर्नाटक - 64.60 टक्के, राजस्थान - 60.50 टक्के, मध्य प्रदेश 55.50 टक्के, महाराष्ट्र - 53.70 टक्के आणि बिहारमध्ये 54.20 टक्के मतदारांना मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ जागांवर मतदान झाले. यामध्ये विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ-वाशिम तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले. मतदारांनी राज्यातील आठ जागांवरील 204 उमेदवारांचे भविष्य ठरवण्यासाठी मतदान केले.

Voting
Supreme Court on NOTA : बिनविरोध विजयात ‘नोटा’ आडवे येणार? कोर्टाने निवडणूक आयोगाकडून मागवले उत्तर

महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी -

वर्धा - 56.66 टक्के, यवतमाळ-वाशिम - 54.04 टक्के, अमरावती -54.50 टक्के, अकोला - 52.49टक्के, बुलडाणा - 52.88 टक्के, हिंगोली - 52.02टक्के, परभणी - 53.79 टक्के, नांदेड - 53.53 टक्के मतदान झालं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com