
Indian Air Force Air Strike POK : जम्मू-काश्मीर पहलगाम हल्ल्याला भारतीय लष्करानं आज मध्यरात्री 'ऑरेशन सिंदूर' राबवून जोरदार प्रत्युत्तर दिलं. पीओकेवरील नऊ दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं एअर स्ट्राईक केलं आहे.
यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली असून, पुढील 48 तासांसाठी आतंरराष्ट्रीय वाहतूक बंद केली आहे. भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून 'LOC'वर मध्यरात्रीपासून गोळीबार सुरू आहे.
भारतीय लष्करानं दहशतवादी तळावर एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे. दहशतवादी तळावर हल्ले करताना भारतीय (India) लष्करानं 24 मिसाईलचा मारा केला होता. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं त्यांची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पुढील 48 तासांसाठी बंद केली आहे.
पाकिस्तानने (Pakistan) लाहौर आणि सियालकोट इथंला हवाई बंद केली आहे. तसेच भारतातील जम्मू-काश्मीरमधील हवाई सेवा कंपन्यांनी बंद केली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद केल्यानं पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आली आहे. दुबई मार्गाने ही वाहतूक वळवण्यात आली आहे. भारतातून युरोप देशाकडे हवाई प्रवास करताना, पाकिस्तानमार्गेच करायला लागतो. त्यामुळे ही वाहतूक हवाई कंपन्यांनी पर्यायी मार्गानं वळवली आहे.
भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळ लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताने हल्ले थांबवले, तर आम्ही उत्तर देणार नाही, असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री आसिफ याने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.