
Bengaluru News : संघप्रमुख भागवत यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान अंगावर 75 ची शाल पडल्यास थांबायला हवं असे विधान केलं होते. तर हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी थाबण्याचा सल्ला होता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यावरून त्यांचा उत्तरराधिकारी कोण? त्यांनी राजीनामा दिल्यास नवे पंतप्रधान कोण? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. अशातच कर्नाटकातील काँग्रेसच्या एका नेत्याने यावर भाष्य करताना महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचे नाव घेतले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान, संघप्रमुख भागवत यांनी, संघाचे विचारवंत दिवंगत मोरोपंत पिंगळे यांचा विधानाचा हवाला दिला होता. तसेच त्यांनी पिंगळे यांनी यांच्या वक्तव्याचा धागा पकडत 75 वय झाल्यास थांबायला हवं असे म्हटलं होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी राजीनामा देतील अशी चर्चा सुरू झाल्या आहेत. तर त्यांचे आदर्श उत्तराधिकारी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच योग्य आहेत. तेच पंतप्रधान व्हावेत, असे मत कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार बेलूर गोपालकृष्ण यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी गोपालकृष्ण यांनी, संघाचे प्रमुख भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, संघप्रमुख भागवत यांच्या वक्तव्याप्रमाणे 75 वर्षांच्या वयानंतर मोदींनी पद सोडल्यास ‘गडकरी देशाचे पुढील पंतप्रधान असले पाहिजेत. कारण गडकरी सामान्य माणसासोबत आहेत. त्यांनी देशाच्या विकासासाठी, महामार्ग आणि इतर बाबतीत चांगले काम केले आहे. देशातील जनता त्यांची सेवा आणि ते कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत हे ओळखते.
गडकरी यांनी देशातील गरिबांबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचा दावा करणाऱ्या विधानांचा उल्लेख केला. हे लक्षात घेता, त्यांच्याकडे (देशाच्या विकासासाठी) एक संकल्पना आहे आणि अशा लोकांना पंतप्रधान केले पाहिजे, असेही गोपालकृष्ण यांनी म्हटलं आहे.
मोहन भागवत यांनी असे संकेत दिले आहेत की ज्यांनी 75 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना पद सोडावे लागेल. त्यामुळे मला वाटते की गडकरींची पंतप्रधान होण्याची वेळ आली आहे,’ असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा 75 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचाही दावा गोपालकृष्ण यांनी केला आहे.
तसेच गोपालकृष्ण म्हणाले की, त्यांच्या पक्षाचा कोणताही नेता मोदींबद्दल बोलत नाही. भाजपच्या पापी लोकांनी त्यांना (येडियुराप्पा) डोळ्यात अश्रू आणून राजीनामा देण्यास भाग पाडले होते. ते एक ज्येष्ठ नेते होते. त्यांनी भाजपची उभारणी केली आणि राज्यात सत्ता आणली. मोदींच्या सूचनेनुसार येडियुराप्पा यांना पद सोडण्यास भाग पाडले गेले नाही का? पण आता भागवत यांनीही हेच म्हटले आहे की 75 वर्षांनंतर सत्तेत राहू नये आणि इतरांना संधी दिली पाहिजे, म्हणून मला वाटते की गडकरींनाही संधी दिली जाईल," असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.