Priyanka Gandhi News : प्रियांका गांधींसाठी असा आहे काँग्रेसचा प्लॅन; पण राहुल जिंकले तरच...

Lok Sabha Election 2024 : रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधींना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते वायनाड मतदारसंघातही काँग्रेसचे उमेदवार आहेत.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSarkarnama

New Delhi News : लोकसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात काँग्रेससाठी दोन मतदारसंघ अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत. एक मतदारसंघ आहेत केरळातील वायनाड आणि दुसरा उत्तर प्रदेशातील रायबरेली. या दोन्ही मतदारसंघात राहुल गांधी उमेदवार आहेत. 2004 नंतर पहिल्यांदाच अमेठीमध्ये गांधी कुटुंबातील एकही उमेदवार नाही. प्रियांका गांधींना (Priyanka Gandhi News) रायबरेलीतून तर राहुल यांना अमेठीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आज काँग्रेसने सर्व शक्यतांवर पडदा टाकला.

काँग्रेसने राहुल (Rahul Gandhi) यांना रायबरेलीतून उमेदवारी देत एकाच निशाण्यात दोन तीर मारल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीच तसे संकेत दिले आहेत. रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून राहुल यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, यावर काँग्रेसला विश्वास आहे. त्यामुळेच राहुल यांना अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)

Priyanka Gandhi
Arvind Kejriwal News : प्रचारासाठी केजरीवालांना मिळणार जामीन? सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान...

रायबरेली (Raebareli) हा काँग्रेसचा गढ मानला जातो. मोदी लाटेतही हा मतदारसंघ सुरक्षित राहिला. सोनिया गांधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायच्या. ता आता राज्यसभेवर गेल्या आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ राहुल यांच्यासाठी सुरक्षित मानला जातो. पण राहुल हे वायनाडमध्ये उमेदवार असताना प्रियांका यांना उमेदवारी का दिली नाही, यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबतही जयराम रमेश यांनीच उत्तर दिले आहे. सध्या प्रियांका गांधी देशभरात पक्षाचा जोरदार प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला त्या सडेतोड उत्तर देत आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यास एकाच मतदारसंघात अडकून पडतील, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. मग प्रियांका गांधी संसदेत कशा पोहचणार, याबाबतही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रियांका गांधी पोटनिवडणुकीतून संसदेत जातील, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितल्याने चर्चेला उधाण आले आहे. यामागे काँग्रेसला मोठा प्लॅन असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासाठी राहुल यांना वायनाडसह रायबरेलीतूनही विजय मिळणे आवश्यक आहे. दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यास राहुल यांना एका मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.

एका मतदारसंघातील खासदारकीचा प्रामुख्याने रायबरेली मतदारसंघातून राजीनामा देत ही जागा ते आपली बहीण प्रियांका यांच्यासाठी रिकामी करतील. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रियांका यांना उमेदवारी देत काँग्रेसकडून त्यांना संसदेत पाठवले जाऊ शकते. पण रायबरेलीतून किती मताधिक्य मिळते, यावरून बरेच अवलंबून असणार आहे. अन्यथा वायनाड मतदारसंघाचाही काँग्रेसकडून विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Priyanka Gandhi
Supreme Court News : …निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही; कोर्टानं का घेतलं लालू अन् राहुल गांधींचं नाव?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com