India Alliance : उत्तर प्रदेशातून ‘इंडिया’साठी खुशखबर; अखिलेश यांचं मोठं विधान...

Congress-SP : लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू...
Akhilesh Yadav, Rahul Gandhi
Akhilesh Yadav, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. भाजपसाठी सर्वात महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून आघाडीसाठी खुशखबर आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भूमिका मवाळ झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) जागावाटपावरून काँग्रेस (Congress) आणि सपामध्ये (Samajwadi Party) दुरावा निर्माण झाला होता. अखिलेश यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीत (India Alliance) फुट पडणार, असे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर अखिलेश (Akhilesh Yadav) यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

Akhilesh Yadav, Rahul Gandhi
Mayor Election : महापौर निवडणुकीत ट्विस्ट, अधिकारीच पडले आजारी; 'ऑपरेशन लोटस फेल'...

अखिलेश यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, मध्य प्रदेशात झालेला वाद आता भूतकाळ आहे. इंडिया आघाडीतील जागावाटपामध्ये काहीही गोंधळाची स्थिती नाही. इंडिया आघाडीमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत काँग्रेस आणि सपामध्ये चर्चा झाल्याचेही अखिलेश यांनी स्पष्ट केले. जागावाटप योग्यपध्दतीने होईल आणि आम्ही उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अखिलेश यांच्या या विधानामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे मायावती यांनी आघाडीत न येण्याचा निर्णय जाहीर केल्याने मतविभाजन अटळ आहे. त्यातच अखिलेश यांची नाराजी काँग्रेसला परवडणारी नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद मिटल्याने आता इंडिया आघाडीसाठी सकारात्मक बाब असल्याचे मानले जात आहे.

अखिलेश यांनी मायावती यांच्याविषयी बोलतानाही सावध भूमिका मांडली. मायावती यांनी समाजवादी पक्षासह अखिलेश यांच्यावरही नुकतीच जोरदार टीका केली होती. ते सरड्यासारखे रंग बदलणार असल्याच्या त्या म्हणाल्या होत्या. त्यावर अखिलेश म्हणाले, मी कोणत्याही व्यक्तीविषयी नाराज नाही. मागावर्गीय, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांना सन्मान मिळावा, ही समाजवादी विचारधारा आहे.

Akhilesh Yadav, Rahul Gandhi
Bilkis Bano Case : आजारी आई-वडील, शेतकाम अन् मुलाच्या लग्नासाठी गुन्हेगारांना हवाय वेळ; सुप्रीम कोर्टात धाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com