Mahakumbh Stampede : कुंभमेळ्यासाठी मौनी अमावस्या ठरतेय जीवघेणी? 12 वर्षांपुर्वी चेंगराचेंगरीत 36 बळी, यंदाही तांडव

Mahakumbh 2025 Stampede News : प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभमेळ्यात बुधवारी मौनी अमावस्याच्या दिवशी अमृतस्नान करण्यासाठी भाविकांनी संगम किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 17 हून जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Mahakumbh Stampede
Mahakumbh StampedeSarkarnama
Published on
Updated on

2025 Kumbh Mela Accident : प्रयागराजमध्ये (Prayagraj) सुरु असलेला महाकुंभमेळ्यात बुधवारी मौनी अमावस्याच्या दिवशी अमृतस्नान करण्यासाठी भाविकांनी संगम किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच मंगळवारी (ता.28) रात्री दीडच्या सुमारास रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 17 हून जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मात्र, या दुर्घटनेत नेमका किती भाविकांचा मृत्यू झाला याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh 2025) चेंगराचेंगरीच्या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे 12 वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात घडलेल्या अशाच एका मोठ्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

12 वर्षांपूर्वी देखील बरोबर मौनी अमावस्येच्या दिवशीच प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी झाली यात 36 जणांनी जीव गमवावा होता. 2013 साली झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले होते. कुंभमेळ्यात जाण्यासाठी बहुसंख्ये लोक रेल्वेने जात होती. तर 10 फेब्रुवारी रोजी मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर अमृतस्नान करण्यासाठी अनेक लोक प्रयागराजकडे रवाना झाले केली होते.

Mahakumbh Stampede
Mahakumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी 10 जणांचा मृत्यू तर शेकडो भाविक जखमी, अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय

याचवेळी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये 36 लोकांनी आपला जीव गमावला होता. अशातच आज बरोबर बारा वर्षांनी आलेल्या मौनी अमावस्येच्या दिवशी संगम किनाऱ्याजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी भाविकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि तसेचमुख्य संगमाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न न करता जवळच्या घाटावर स्नान करावं, असं आवाहन केलं आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्याशी दोन वेळा फोनवरून चर्चा करत सर्व घटनेचा आढावा घेतला आहे.

Mahakumbh Stampede
MahaKumbh Stampede : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर CM योगींचं भाविकांना मोठं आवाहन; म्हणाले, "तुम्ही ज्या घाटाजवळ आहात..."

चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे?

महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान पवित्र आणि महत्वाचे मानले जाते. त्यामुळे अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात संगम किनाऱ्यावर अमृतस्नान करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी काही महिलांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि त्या बेशुद्ध होऊन कोसळल्या, तर गर्दी वाढल्याने पोलिस लोकांना घाटावरुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहींनी घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे बॅरिकेड तुटले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com