Marathi Sahitya Sammelan 2025 : मोदींनी 'छावा'ची धूम असल्याचे म्हटले..; जोरदार शिट्ट्या, टाळ्यांचा कडकडाट अन् घोषणा...

PM Narendra Modi actor Vicky Kaushal film Chhaava 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 Delhi : दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात 'छावा' चित्रपटाचा उल्लेख केला.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : छत्रपती संभाजी महाराज यांचं धर्म प्रेम सांगणारा, त्याचा इतिहास सर्वदूर नेणारा छावा चित्रपटाची सर्वत्र धूम सुरू आहे.

या चित्रपटाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केला. मोदींनी चित्रपटाचा आपल्या भाषणात उल्लेख करताना, सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. शिट्ट्या, टाळ्यांचा कडकडाट झाला.

पंतप्रधान मोदी यांनी मुंबईचा (Mumbai) उल्लेख करताना आपली असा केला. मुंबई महाराष्ट्राची नव्हे, तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. मुंबईचा उल्लेख आलाच आहे, तर चित्रपटांशिवाय ना साहित्याची चर्चा होऊ शकते, ना मुंबईची! महाराष्ट्र आणि मुंबईने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांनाही एका उंचीवर नेले आहे. सध्या तर, 'छावा'ची धूम सुरू आहे, असे उल्लेख केला.

PM Narendra Modi
Marathi Sahitya Sammelan 2025 : मोदींनी उलगडले मराठी भाषेशी संघाचे नाते; दिल्लीतील संमेलनात पंतप्रधानांची मराठीतून फटकेबाजी

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) तोंडून 'छावा' चित्रपटाचा उल्लेख होताच, या चित्रपटाची हवा, दिल्लीपर्यंत पोचली. याचवेळी सभागृहात जोरदार शिट्ट्या, टाळ्यांचा कडकटात आणि घोषणा, सुरू झाल्या. मोदींनी लगेचच पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा या स्वरुपातील परिचय शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीनेच करून दिला, असेही म्हटले.

PM Narendra Modi
Eknath Shinde : ''उबाठा'ची स्थिती म्हणजे, तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं'; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेची उडवली खिल्ली

मराठी भाषेचे कौतुक करताना, मोदी यांनी मराठी साहित्यात विज्ञान कथांचीही रचना झाली. आयुर्वेद, विज्ञान आणि तर्कशास्त्रातही महाराष्ट्रातील साहित्यिकांचे मोठे योगदान आहे. याचमुळे महाराष्ट्राने नेहमीच नवे विचार आणि प्रतिभेतून प्रगती साधल्याचे मोदी यांनी सांगितले.

समर्थ रामदास स्वांमींचा उल्लेख करताना मोदींनी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची वाहक असते. भाषा समाज निर्मितीत तेवढीच महत्वाची भूमिका पार पाडत असते, असे सांगताना समर्थ रामदासांच्या 'मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा। आहे तितुके जतन करावे। पुढे आनिक मिळवावे। महाराष्ट्र राज्य करावे।।, या रचनेची आठवण मोदींनी करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com