केजरीवालांना चार वर्षात जमलं नाही ते मान यांनी बारा दिवसांत करून दाखवलं!

पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत.
Bhagwant Mann & Arvind Kejriwal News, Bhagwant Mann News, Punjab News Updates, AAP News
Bhagwant Mann & Arvind Kejriwal News, Bhagwant Mann News, Punjab News Updates, AAP News Sarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्याकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. सुरूवातीला भ्रष्टाचारासाठी हेल्पलाईन, 35 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी आदी निर्णय घेत मान यांनी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर सोमवारी (ता. 28) त्यांनी आणखी एक मोठी घोषणा करत पंजाबच्या नागरिकांचे मन जिंकले. (Bhagwant Mann News)

पंजाबमध्ये आता घरोघरी रेशन पोहचवले जाणार असल्याची घोषणा मान यांनी केली. या घोषणेचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी स्वागत केले आहे. दिल्लीत मागील चार वर्षांपासून ही योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याला यश मिळालेले नाही. पंजाबमधील घोषणेनंतर केजरीवाल यांनी याबाबत आपली खदखद व्यक्त केली असून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

Bhagwant Mann & Arvind Kejriwal News, Bhagwant Mann News, Punjab News Updates, AAP News
सहा लाख महागात पडले; काँग्रेस आमदाराला तीन वर्षांचा कारावास

केजरीवाल म्हणाले, स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनीही रेशनिंगसाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. तर दुसरीकडे एका फोनवर पिझ्झा घरी येतो. रेशन घरोघरी या योजनेअंतर्गत सरकार तांदूळ, पीठ घरी पोहचवले जाईल. दिल्लीत चार वर्षांपासून आम्ही ही योजना लागू करण्यासाठी संघर्ष करत आहोत. सगळं काही झालं होतं. पण केंद्रातील भाजप सरकारने त्यात खोडा घातला.

दिल्लीत भाजपने आम्हाला घरोघरी रेशन पोहचविण्याची योजना लागू करू दिली नसली तरी पंजाबमध्ये आम्ही करून दाखवलं आहे. आता याकडे बघून देशभरात ते लागू केले जाईल. दिल्लीत आमच्या योजनांना कसं रोखलं गेलं, हे देशानं पाहिलं आहे. मोहल्ला क्लिनीक, शाळा, रुग्णालयांची कामे थांबली. या देशातील लोक पुढे जाऊ इच्छितात. पण त्यांना 75 वर्षांपासून रोखले जात आहे. पण आता लोक थांबणार नाहीत, असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

भगवंत मान आणि अमित शहा आमनेसामने

भगवंत मान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आमनेसामने आले आहे. त्याचं कारणही तितकंच मोठं आहे. अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी पंजाबची राजधानी चंडीगडमध्ये (Chandigarh) येऊन सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मोठी घोषणा केली. याच घोषणेमुळे वादाची ठिणगी पडली आहे. शहा हे रविवारी चंदीगडमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी चंदीगड या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. चंडीगड प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठीचे सेवा नियम आता केंद्रीय नागरी सेवांप्रमाणे असतील, अशी घोषणाही शहा यांनी केली. याचे अनेक फायदे कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले होते. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com