Rahul Gandhi On NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राहुल गांधींचा शरद पवारांना फोन; म्हणाले...

Ajit Pawar NCP : अजित पवारांचे थेट शरद पवारांनाच आव्हान
Rahul Gandhi, Sharad Pawar
Rahul Gandhi, Sharad PawarSarkarnama

Rahul Gandhi Call Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात एक वर्षानंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेनंतर रविवारी (ता. २ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी ५४ आमदारांपैकी ३५ आमदारांसह बाहेर पडले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Latest Political Marathi News)

Rahul Gandhi, Sharad Pawar
Sharad Pawar And Gopinath Munde : गोपीनाथ मुंडेचे 'ते' शब्द खरे ठरले; पवारांबाबत केलेल्या विधानाचा व्हिडिओ व्हायरल..

अजित पवारांच्या या बंडामुळे कालपर्यंत भाजपविरोधात आणाभाका घेणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा सुरूंग लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही संबंधित नेत्यांची भूमिका आहे. यात माझा आणि पक्षाचा कुठलाही हात नसल्याची भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनीही भाजपच्या राजकारणावर टीका केली.

राज्यात झालेल्या राजकीय महाभूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी न्यायालयात जाण्याऐवजी जनतेत जाणार असल्याची भूमिका घेतली आहे. या भूमिकेनंतर शरद पवार यांना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, माजी खासदार राहुल गांधी यांनी फोन केला. यावेळी गांधी यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधी यांनी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ठामपणे सांगितल्याची माहिती आहे.

Rahul Gandhi, Sharad Pawar
Ajit Pawar Breaking News : मोठी बातमी! शिंदे सरकारमध्ये अजित पवारांना जलसंपदा तर उर्वरित मंत्र्यांना मिळणार 'हे' खाते....

बंड केल्यानंतर अजित पवारांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आणि चिन्हावरही दावा सांगितला. अजित पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत. घड्याळ चिन्हावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. देशपातळीवरील सध्या जी परिस्थिती आहे, त्याच्या विचार केला असता विकासाला महत्व दिले पाहिजे. हे सर्व सहकाऱ्यांचे मत होते. नऊ वर्षांपासून मोदी सरकार चांगले काम करीत आहे. त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मोदींमुळे देशाचा विकास होत आहे. राज्यामध्ये विकासाला महत्व दिले पाहिजे. त्यामुळे राज्यात मजबूत खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केंद्रीय निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला जाईल."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com