भाजपच्या विजयानं विरोधक हादरले; अखिलेश यांच्या मित्रपक्षाकडून सर्व समित्या बरखास्त

उत्तर प्रदेशातील दारूण पराभवानंतर राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी सोमवारी राज्य कार्यकारिणीसह सर्व समित्या बरखास्त केल्या आहेत.
Akhilesh Yadav, Jayant Chaudhary
Akhilesh Yadav, Jayant ChaudharySarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) दारूण पराभवानंतर राष्ट्रीय लोक दलाचे (RLD) प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी सोमवारी राज्य कार्यकारिणीसह सर्व समित्या बरखास्त केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपला (BJP) अनपेक्षित जागा मिळाल्याने समाजवादी पक्षासह (Samajwadi Party) आरएलडीलाही जोरदार धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या धक्क्यातूनच चौधरी यांनी हा निर्णय घेतला आहे.

आरएलडीने अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आघाडी करत विधानसभेची निवडणूक (Assembly Election) लढवली होती. या निवडणुकीत आरएलडीने 33 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पण केवळ आठ उमेदवार विजयी झाले आहेत. तर सपाला 111 जागा मिळाल्या आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत सपाला केवळ 47 जागा मिळाल्या होत्या. सपाच्या जागा वाढल्या असल्या तरी आरएलडीला अपेक्षित यश मिळालेलं नाही.

Akhilesh Yadav, Jayant Chaudhary
हत्या काँग्रेस नगरसेवकाची अन् विधानसभेत गोंधळ घातला भाजपनं

भाजपने (BJP) 403 पैकी 255 जागा जिंकत पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. भाजपला राज्यात 41.29 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील 37 वर्षांत पहिल्यांदाच पुन्हा एकाच पक्षाचे सरकार आले आहे. भाजपने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची चर्चा सुरू असताना सपा आणि आरएलडी जोरदार धक्के बसू लागले आहेत. त्याचा पहिला झटका आरएलडीला बसला आहे. आरएलडीच्या राज्यातील सर्व समित्या, कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसमध्येही बंडाचे वारे

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. मतमोजणीच्या आदल्यादिवशीच उत्तर प्रदेशातील पक्ष प्रवक्ते व माध्यम संयोजक नेत्यानं पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर आता या नेत्यानं प्रियांकांच्या यांच्यामुळे पक्षातील 30 माजी खासदार व आमदारांनी पक्ष सोडल्याचा दावा केल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. (UP Election Results)

Akhilesh Yadav, Jayant Chaudhary
...'ती' चूक सोनियांनी स्वीकारली! सिध्दूंसह पत्नी व मुलीवर फोडलं खापर

उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत पक्षाला 6.25 टक्के मतं मिळाली होती. हा आकडा आता 2.4 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना तुमकुही राज मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. त्यामुळे राज्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com