Maharashtra Assembly Election : मोठे गौडबंगाल! महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त?

Maharashtra Census Voters List Congress Allegations : काँग्रेसच्या सांख्यिकी विभागाकडून हा दावा करण्यात आला असून निवडणूक आयोगाला आकडेवारीवरून पुन्हा सवाल केला आहे.
Maharashtra Election
Maharashtra ElectionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांच्या वाढलेल्या संख्येबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्टीकरण दिले. पण आता काँग्रेसने पुन्हा गुगली टाकली आहे. महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचा दावा पक्षाच्या सांख्यिकी विभागाने केला आहे. त्यामुळे मतदारांच्या आकडेवारीचे नेमके गौडबंगाल काय, याबाबतचा संभ्रम पुन्हा निर्माण झाला आहे.

काँग्रेसच्या सांख्यिकी विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यासाठी त्यांनी मोदी सरकारच्या एका अहवालाचा हवाला दिला आहे. चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान गुढपध्दतीने वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर काल खुलासा केला. काँग्रेसने जवळपास ५० लाख मतदार केवळ चार महिन्यांत वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आयोगाने मतदार जोडण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि फुलप्रुफ असल्याचे सांगितले.

Maharashtra Election
Delhi Assembly Election : दिल्लीत भाजपला झटका; मंदिर आघाडीला खिंडार, ‘आप’ची मोठी खेळी

आयोगाच्या दाव्याला आमच्याकडून केवळ एक प्रश्न असल्याचे सांगत चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की, जर ही प्रक्रिया फुलप्रुफ असेल तर महाराष्ट्रातील एकूण पात्र मतदारांची संख्या नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्याच अहवालात अंदाज व्यक्त केलेल्या एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त कशी? असा सवाल चक्रवर्ती यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या नोव्हेंबर 2019 च्या अहवालाचा हवाला दिला आहे. 

अहवालामध्ये महाराष्ट्रातील अंदाजित प्रौढ लोकसंख्या 2024 मध्ये 9.54 कोटी वर्तविण्यात आली होती. निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी एकूण पात्र मतदार 9.70 कोटी होते. ही आकडेवारी ग्राह्य धरल्यास निवडणूक आयोगाने अंदाजित लोकसंख्येपेक्षा 16 लाख अधिक मतदारांची नोंद केल्याचे दिसते, असे चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

Maharashtra Election
Delhi Assembly Election : काँग्रेस एकाकी; सर्वच प्रमुख मित्रपक्षांनी सोडली साथ, कोणती चूक नडली?

अंदाजामध्ये काही तफावत असली तरी निवडणूक आयोगाने 100 टक्के लोकांची मतदार म्हणून नोंद केली किंवा त्यापेक्षा जास्त मतदार राज्यात आहेत?, असा सवालही चक्रवर्ती यांनी केला आहे. इतर राज्यांची आकडेवारी पाहिल्यास पात्र लोकसंख्येच्या केवळ 90 टक्क्यांपर्यंतच मतदारांची नोंद होते. केवळ महाराष्ट्रातच 100 टक्के किंवा त्याहून अधिक मतदारांची नोंद कशी झाली, असेही चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com