Uddhav Thackeray on Budget : अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे भडकले; म्हणाले, 'महाराष्ट्र खड्ड्यात..'

Ajit Pawar Budget 2025 News : विधानसभा निवडणूक काळात वारेमाप जाहिराती दिल्या. त्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचे काम सुरु झालंय,अशा शेलक्या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य सरकारने जाहीर केलेला हा अर्थसंकल्प हा अंत्यत बोगस आहे, असा अर्थसंकल्प गेल्या दहा वर्षात पाहिला नाही. अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेच्या हाती काहीच लागले नाही. राज्य सरकारने यामध्ये केवळ थापा मारल्या आहेत. विधानसभा निवडणूक काळात वारेमाप जाहिराती दिल्या. त्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे. राज्य सरकारकडून केवळ महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचे काम सुरु झालंय,अशा शेलक्या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.

पाच वर्षांत जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या नाहीत. तर शेतकऱ्यांच्या विजेच्या थकबाकीचे काय करणार ? हे स्पष्ट केले नाही तर शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेबाबत घोषणा केली नाही. मुंबईसाठी 64 हजार कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे सर्वसामान्यासाठी नाहीत तर केवळ हे सर्व कामे गुत्तेदारासाठी (कॉन्ट्रॅक्टर) आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) केली.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : वय झाले, इच्छाशक्ती कायम..! दोन नेत्यांनी फोडलाय शक्तिशाली सत्ताधाऱ्यांना घाम

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याऐवजी 24 तास वीज द्यावी, अशी मागणी आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकीकडे मेट्रोवर खर्च केला जातोय मग बेस्टवर का केला जात नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित करीत महायुती (Mahayuti) सरकारच्या कारभारावर टीका केली.

Uddhav Thackeray
Ajit Pawar Budget 2025 Live : सत्ता मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींचा भ्रमनिरास; अजितदादांकडून 'ती' घोषणा नाहीच...

सर्वसामन्यासाठी काहीच नाही...

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी यांनी केलीय का? शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा केव्हा देणार…? तुमचं सरकार स्थिर असताना जीवनावश्यक वस्तू स्थिर केव्हा ठेवणार…? आजच्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे? सामान्य माणसासाठी, काही नाही पण कॉन्ट्रॅक्टरसाठी खूप काही आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray
Ajit Pawar : सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला वानखेडेंनी; अजित पवारांचा नंबर कितवा?

थापानामा किंवा झोलानामा म्हणा

दोन विमानतळ जोडण्याचे कामही सरकार करणार म्हटले आहेत. पण हे अदानीचे काम आहेत. तुम्ही तुमच्या मालकाची काम करणार आहात का? शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा केली. पण आता शेतकऱ्यांना बिल यायला लागली त्याच तुम्ही काय करणार आहात? थापानामा किंवा झोलानामा म्हणा. त्यांनी 2024 निवडणुकीत बोलले होते, त्यातील एक गोष्ट तरी आज केलीय का? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. अत्यंत बोगस अर्थसंकल्प आहे. असा अर्थसंकल्प गेल्या दहा वर्षात पाहिला नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Uddhav Thackeray
Maharashtra Budget 2025 : अजितदादांचा 'संभाजी महाराज की जय'चा जयघोष; संगमेश्वर येथे भव्य स्मारक होणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com