
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा आदेश जारी केला.
सरकारच्या या आदेशानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून, अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत.
महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
Mumbai News : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारत उपोषणाचे अस्त्र काढल्यानंतर पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांना यश आले. त्यांनी गुलाल उधळत हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारला भाग पाडले. त्यानंतर शासन एका तासात याचा आदेश (GR) काढला. यानंतर आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला असून राज्यभर आंदोलने केली जात आहेत.
दरम्यान या निर्णयाचा पहिली वादाची ठिणगी महायुती सरकारमध्येच पडली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी थेट सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. त्यांनी सरकारने काढलेल्या आदेशावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या प्री-कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली. यामुळे सरकारच्या या आदेशाला भुजबळ यांचा विरोध असल्याचे आता समोर येत आहे.
याबाबत भुजबळ यांनी बुधवारी (ता.3) आपली प्रतिक्रिया देताना, काल सरकारने जो जीआर काढला आहे, त्याबद्दल आमच्या ओबीसी नेत्यांच्या मनात नाराजी आहे. त्यांच्या मनात शंका आहे. कोण हरलं का कोण जिंकलं? याचा आम्ही विचार न करता आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. राज्य सरकारने काढलेल्या या जीआरचा नेमका अर्थ काय आहे? तो कोणासाठी काढला हे तपासत आहोत. एखाद्या जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही.
यामुळे आता आम्ही या जीआरविरोधात न्यायालयात जाणार आहोत. काही लोक म्हणतात, हरकती मागवल्या पाहिजे होत्या. उपसमितीला निर्णय घ्यायचा अधिकार आहे का? असेही प्रश्न आता विचारला जात असतानाच सरकार असा निर्णय घेईल, याची अपेक्षा नव्हती म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रश्न: छगन भुजबळ यांनी कोणत्या कारणास्तव मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला? उत्तर: मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या आदेशाला विरोध दर्शवण्यासाठी छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
प्रश्न: मराठा आरक्षणासाठी सरकारने कोणता आदेश काढला आहे? उत्तर: सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात आदेश (GR) काढला आहे.
प्रश्न: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण कधी मागे घेतले? उत्तर: मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवसांच्या उपोषणानंतर उपोषण मागे घेतले.
प्रश्न: या निर्णयामुळे कोणत्या समाजात नाराजी पसरली आहे? उत्तर: सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाज नाराज झाला असून, त्यांनी राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत.
प्रश्न: महायुती सरकारमधील कोणत्या पक्षांमध्ये या निर्णयावरून वाद सुरू आहे? उत्तर: महायुती सरकारमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात या निर्णयावरून मतभेद समोर आले आहेत, विशेषतः छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.