devendra fadnavis
devendra fadnavissarkarnma

Devendra Fadnavis Video : शेतकरी अडचणीत! कर्जमाफीविषयी देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'वारंवार करता येत...'

Rain Damage Farmers Loan Waiver : अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने कर्जमाफी करण्याची मागणी होत आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.
Published on

Devendra Fadnavis News : अतिवृष्टीमुळे शेतकीर अडचणीत सापडला आहे. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. महाराष्ट्रभर पावसाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. त्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत राज्याचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची माहिती दिली. माध्यमांशी संवाद साधताना कर्जमाफीच्या मागणीविषयी फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, 'कर्जमाफी संदर्भात आम्ही घोषणापत्रात आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता करणार आहोत. मात्र, ती कधी व कशी करायची हे आमची समिती अभ्यास करत आहे.'

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, 'कर्जमाफी वारंवार करता येत नाही. त्यामुळे ती करताना परिमाणकारक होणे आवश्यक आहे. सध्या काय महत्त्वाचे आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचवणे. ते आमचे कर्तव्य आहे. खरीपासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना पुढील वर्षी करावी लागणार आहे.'

devendra fadnavis
Eknath Shinde VS BJP : एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाजपमध्ये नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांकडे करणार तक्रार! नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

25 हजार 477 कोटींची थकबाकी

शेतकऱ्यांना बँकाचे कर्ज मिळण्यासाठी पूर्वीची थकबाकी भरलेली असणे गरजेचे आहे. मात्र, शेतकऱ्यांची तब्बस 25 हजार 477 कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहेत. या थकबाकीमुळे तब्बल 25 लाख शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफी विषयी बोलताना स्पष्ट केले की, कर्जमाफी एकदाच केली झाले ती वारंवार केली जात नाही. त्यामुळे परिणामकारक होणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार लगेच कर्जमाफी करण्याच्या तयारी दिसत नाही. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कर्जमाफीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

devendra fadnavis
Thalapathy Vijay Rally :38 जणांचा मृत्यू अन् शेकडो जखमी; विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे? मोठं कारण आलं समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com