Loan Waiver News : अतिवृष्टीने शेतकरी चिंतेत आहे. सगळं पीक वाहून गेले आहे. मराठवाडा तसेच सोलापूर जिल्ह्यात पूरामुळे घरांचे नुकसान झाले आहे. जनावरे वाहून गेली आहेत. त्यात राज्यातील शेतकऱ्यांकडे बँकांची तब्बल 25 हजरा 477 कोटींची थकबाकी आहे. या परिस्थितीमध्ये थकबाकी न भरल्यास 25 लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नसल्याचे समोर आले आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पीक वाया गेले आहे. त्यात जर पुन्हा कर्ज मिळाले नाही तर शेतकऱ्यांवर आणखी मोठे संकट कोसळेल, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने थकबाकीचा अहवाल मागवला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बँकांच्या कर्जासोबत सुमारे दहा लाख शेतकऱ्यांवर खासगी सावकारांचे दीड ते दो कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी पुन्हा खासगी सावकाराच्या जाळ्यात अडकण्याची भीती आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता कर्जमाफीसंदर्भात समिती अभ्यास करत असून ऑक्टोबर अखेर पर्यंत सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती ते पंतप्रधानांना देणार असल्याची शक्यता आहे. केंद्राकडून भरीव मदत करावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.