यापुढे हे चालणार नाही! राणे सुटताच वैभव नाईकांचा थेट इशारा

भाजपचे (BJP) आमदार नितेश राणेंच्या सुटकेने कोकणातील वातावरण पुन्हा तापल्याचे दिसत आहे.
Nitesh Rane, Vaibhav Naik
Nitesh Rane, Vaibhav NaikSarkarnama

सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जामिनावर सुटका झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये पोचल्यानंतर राणेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. यावर आता शिवसेनेचे (Shivsena) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी राणेंना थेट इशारा दिला आहे. यामुळे राणेंच्या सुटकेने कोकणातील वातावरण पुन्हा तापल्याचे दिसत आहे. (Nitesh Rane Updates)

वैभव नाईक यांनी राणेंवर निशाणा साधत त्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे कुणाचीही दहशत चालणार नाही. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता तो सिद्ध होईल अथवा नाही, हा न्यायालयाचा निर्णय असेल. मात्र, त्यांचा या हल्ल्यात सहभाग असल्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे कोणाचीही दहशत चालणार नाही, हे भाजपचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी लक्षात घ्यावे की.

राणेंनी सुटका झाल्यानंतर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते की, माझ्या तब्येतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे साजेसे आहे का? याचा विचार या निमित्ताने करायला हवा. मग आम्ही प्रश्न विचारायचे का? सरकार पडण्याची वेळ येते, ईडीच्या कारवाई सुरू होतात तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? असे प्रश्न विचारले तर चालेल का? लतादीदींच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री स्वत गेले, असे मी ऐकले. तिथे त्यांच्या गळ्यात बेल्ट नव्हता. मग अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आजारी का पडतात? महाविकास आघाडीची जी नेतेमंडळी आहेत, त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांना 14 दिवस कोरोना त्यांना कसा होतो. कोणाच्या तब्येतीबद्दल आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे नैतिकतेच्या चौकटीत बसते का?

Nitesh Rane, Vaibhav Naik
सुटका होताच नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीला पुन्हा डिवचलं

नितेश राणेंना या जामीन मंजूर करतानाही न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. न्यायालयाने राणेंना कणकवली तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाहीत. आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, अशाही अटी घालण्यात न्यायालयाने घातल्या आहेत.

Nitesh Rane, Vaibhav Naik
जामिनावर सुटताच नितेश राणे म्हणाले, मला अटक झालीच नाही!

नितेश राणेंच्या छातीत दुखत असल्याने आणि मणक्याचा त्रास असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरला हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयातील हृदयरोग विभागात उपचार सुरू होते. राणेंचा त्रास आणखी वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. या पथकात हृदयरोगतज्ञ आणि अस्थिरोगतज्ञांचा समावेश आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार होती. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तातडीने नितेश राणेंना रुग्णालयाचून डिस्चार्ज घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com