Nitesh Rane News : सिंधुदुर्गातील 156 जागांवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. या जागांची यादी समोर आली आहे. कणकवली, कुडाळ, देवगड तालुक्यातील या जागा आहे. वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात आलेल्या जागांमध्ये शेत जमिनींचा देखील समावेश आहे.
मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 टक्के जागांवर, देवस्थानांवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला असल्याचा दावा केला आहे.
नितेश राणे म्हणाले, हा फार मोठा धोका आहे. वक्फ बोर्ड सारखे बोर्ड अथवा जो काही कायदा आहे तो आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. सुदैवाने आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे.
देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आहेत. तुम्ही विचार करा महाविकास आघाडीचे सरकार असतं तर आपल्या सिंधुदुर्गातील 50 ते 60 टक्के जमिनी, त्या १५६ जागा त्यांनी वक्फ बोर्डाला देऊन टाकल्या असता.
मराठवाड्यातील देखील अख्खा गावावर देखील वक्फ बोर्डाने दावा केल्याचे समोर आले होते. लातुर जिल्ह्याती अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांनी 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे. शेतकऱ्यांनी सरकारने या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती सरकारने केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.