
BJP Vs Shivsena : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या प्रभाग रचनेत फिक्सिंग होत असल्याचा आरोप भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. कथोरे यांनी या पत्रात कोणाचाही उल्लेख केला नाही. पण त्यांचा रोख शिवसेनेकडे असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत.
भाजप आमदार किसन कथोरे यांनी लिहिलेल्या पत्रात, अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या प्रभाग रचना आराखडा निश्चित झाला असून मंजुरीसाठी तो नगर विकास विभागाकडे पाठवला आहे. मात्र, ही प्रभाग रचना करताना अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. एका विशिष्ट पक्षाचे स्थानिक नेते आणि अधिकारी यांनी हातमिळवणी करून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना करवून घेतली आहे, असा आरोप केला आहे.
काही नगरसेवकांना फायदा होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सोयीनुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे. किमान 15 ते 16 प्रभागांमध्ये अशी हेराफेरी करण्यात आली आहे. त्यामुळे नगरविकास विभागाकडून प्रभाग रचनेचे प्रारूपला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी प्रभाग रचनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, व चुकीची प्रभाग रचना रद्द करून नव्याने करण्यात यावी अशी मागणीही कथोरे यांनी पत्रात केली.
कथोरे यांनी पत्रात पक्षाचा नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख शिवसेनेकडे असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वीच भाजप - शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्राची दखल घेतात का? चौकशीचे आदेश देतात का? मंजुरीसाठी पाठविण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करतात का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.