Nana Patole News : आम्हीच जिंकणार, हा काॅन्फिडन्स महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. मात्र, विजयचा दावा करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट महाराष्ट्रात किती जागा मिळणार याचा आकडाच जाहीर केला. 'देशात महाविकास आघाडी 300 जागा पार करेल आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 40 च्यावर जागा मिळतील', असा दावा पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या विषयी लोकांच्या मनात रोष आहे. मोदींनी मतदारराजाचा अपमान केला आहे. देशाचे संविधान सुरक्षित नाही. निवडणुकीचा प्रचार सुरू होता तेव्हा महाराष्ट्रातील 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला आहे.
कांद्यावर बोला, असे पंतप्रधान मोदींना Narendra Modi म्हणणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला जात नाही. त्यांना मदत केली जात नाही. राज्यात दुष्काळ वाढला आहे. टँकर माफीया सक्रिय झाल्याचा आरोप देखील पटोले यांनी केलाय.
मंत्री विदेशात गेले आहे. मुख्यमंत्री तीन दिवस सुटीवर आहेत. राज्य या प्रकारे चालत नाही. राज्यात दुष्काळ आहे. आम्ही उद्या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहोत. लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. भाजप याला राजकारण म्हणते मात्र लोकांना भेटणे गरजेचं असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले यांनी महाविकास आघाडी 40 च्यावर जागा जिंकले, असा दावा करत आहेत. भाजपचे नेते देखील आम्ही 40 च्या वर जागा जिंकणार असल्याचे दावा करत आहेत. प्रवीण दरेकर यांनी महायुती राज्यात 42 च्या वर जागा जिंकेल तसेच गुजरातमध्ये 26 पैकी 26 जागा तसेच राजस्थानमध्ये पैकीच्या पैकी जागा जिंकण्याचा दावा केला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.