अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं नुकसानीने धाराशिवमधील शेतकऱ्याने आत्महत्या केली. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथल्या शेतकऱ्यांने गळफास घेतला. उमेश सूर्यकांत ढेपे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. अणदूर इथल्या आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.
पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेला जवळपास 23 कोटी 30 लाख 92 हजार 750 रुपये किमतीचा अंमली पदार्थ पोलिसांनी भट्टीत जाळून नष्ट केलं आहे. यात जवळपास 662 किलो 455 ग्रॅम गांजा आणि 19 किलो 997 ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्स या अंमली पदार्थांचा समावेश आहे.
"आपल्या जिल्ह्यात टपोरी लोक आहेत. त्यांच्या संपत्तीची पूर्ण यादी आमच्याजवळ आहे. जे स्वतःला शेतकरी नेते म्हणतात, महाराष्ट्रमध्ये फिरत आहे, आमच्या जिल्ह्यातला माजी आमदार आहे. आपल्या संपत्तीमधील दहा टक्के जरी शेतकऱ्यांसाठी वाटप केली, तर थोडी माणुसकी शेतकऱ्यासाठी राहील. राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची हे त्यांचं काम आहे," असा घणाघात माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर आमदार रवी राणा यांनी केला.
फेकायचं म्हणजे किती ? त्याला काही मर्यादा आहेत की नाही? भाजप आणि या तीनचाकी रिक्षा सरकारचं असं झालंय की चाराण्याची मदत आणि बाराण्याची जाहिरात... धडधडीत चेक अकरा लाखाचा दिसतोय आणि आशिष शेलार ट्विटमध्ये 55 लाख रुपये सांगतात.. काय शेलार ठाकरेंवर दिवस रात्र टीका करून करून मेंदू झिजला की काय? तुमच्या या असल्या वाढीव गुणामुळेच फडणवीसांनी तुम्हाला बाजूला ठेवून कंबोजला जवळ केलाय बहुतेक. ? सुधरा जरा...!, असे ट्विट करत सुषमा अंधारे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली.
१५ रूपये प्रतिटन ऊस उत्पादक शेतक-यांचे कपात करून १८० कोटी रूपयाची मदत गोळा करण्यापेक्षा शक्तीपीठ महामार्गाचे २० हजार कोटी पुरग्रस्तांना द्या, अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० रुपये असा टनामागे १५ रु. कपात करण्याचा निर्णय घेऊन या सरकारने शेतकऱ्याचाच खिसा कापला. ही एकप्रकारे आधुनिक टोलवसुलीच आहे. देवाचंच घेऊन देवाला लावणाऱ्या या सरकारमध्ये पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे. त्यामुळे सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे शहा यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे. यासह शहांच्या हस्ते लोणी येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावर केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पर्यावरण तथा पशुसंवर्धन विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महायुतीचे इतर लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित राहणार आहेत.
लाडकी बहिण आणि इतर काही लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा आणि विधान परिषेदेच्या 361 आमदारांचा निधी गेल्या 6 महिन्यांपासून रखडला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. स्थानिकच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी तरी निधी मिळावा, अशी मागणी या आमदारांकडून केली जात आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे हा निधी थांबवल्याची तक्रार आमदार करत आहेत.
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधील एन्नोर थर्मल पॉवर स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी छत कोसळून भीषण दुर्घटना घडली आणि या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झालेत.
कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली आहे. इमारतीच्या स्लॅबखाली अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, या दुर्घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू असताना साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. स्लॅबखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. तर घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, माजी आमदार ऋतुराज पाटील दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाच नव्हता असा अहवाल नागपूर ग्रामीण पोलिसांनी कोर्टात सादर केला आहे. 18 नोव्हेंबर 2024 रोजी अनिल देशमुख यांच्या कारवर प्रचारा दरम्यान दगडफेक करुन हल्ला करण्यात आला होता. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती. या हल्ल्यामध्ये देशमुखांच्या डोक्याला मार लागला होता. या हल्ल्याची फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणी केल्यानंतर तयार झालेला बी फायनल रिपोर्ट पोलिसांनी आज कोर्टात सादर केला. पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये FIRमध्ये दिलेला घटनाक्रम झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.