Eknath Shinde : महायुती सरकारची दोन वर्षे..! मुख्यमंत्री शिंदेंचे ‘ते’ तीन शब्द...

Mahayuti Government Maharashtra CM Eknath Shinde : शिवसेनेतील फुटीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं अन् राज्यात युतीचे सरकार आले. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : ‘मी, एकनाथ संभाजी शिंदे..!’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पदाची शपथ घेतली होती. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात युतीचं सरकार अस्तित्वात आले. केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात शिंदेंच्या या बंडाने खळबळ उडाली होती.

महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी तीन शब्दांनीच आपल्या भावनांची सुरूवात केली आहे. विचार, विकास आणि विश्वास... या तीन शब्दांत त्यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामाचा ओळख करून दिली आहे.

काय म्हटले आहे मुख्यमंत्र्यांनी?

मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Video Sujata Saunik News : सुजाता सौनिक राज्याच्या नव्या मुख्य सचिव

दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे भक्कम पाठबळ लाभल्याचेही शिंदेंनी सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली, अशी कृतज्ञताही त्यांन व्यक्त केली.

राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे, असे शिंदे म्हणतात.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis : टीम इंडिया जिंकली, विधानसभेच्या ‘मॅच’चं काय? फडणवीसांचा थेट षटकार...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही, अशी भावना शिंदेंनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com