Maharashtra Political Live Update : संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून प्रस्थान

Marathi Breaking Live Headlines Updates : ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून प्रस्थान झाले, पुणे जिल्हातील पालखी मार्गावर वाहतूकीमध्ये बदल, अधिवेशनाचे सूप वाजले मात्र सत्ताधाऱ्यानी पत्रकार परिषद न घेतल्याने टीका
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

कसारा घाटात मोठा धोका! संरक्षण भिंत कोसळली

जुन्या कसारा घाटात मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडलीये. रस्त्याखालील मातीचा भराव वाहून गेल्याने संरक्षण भिंत कोसळली असून महामार्गाला भेगा पडल्याय. प्रशासनानं तातडीने सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावून या मार्गावरील वाहतूक एकेरी केलये. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय...

ऑपरेशन टायगरचे फोटो समोर, सहा खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले होते

शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे अत्यंत गोपनीय फोटो अखेर समोर आले आहेत. 17 जूनला ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी त्यांना भेटल्याचे दिसत आहे. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हे देखील या खासदारांसोबत उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

CAG ON STATE GOVERNMENT:कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे

कॅगने राज्याच्या आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर आक्षेप नोंदवताना २०२४-२५ या आर्थिक वर्षअखेर राज्याचे अर्थसंकल्पबाह्य कर्ज २८ हजार ३२५ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ताशेरे ओढले आहेत, ही कोट्यवधी रुपयांची देणी राज्याच्या अधिकृत अर्थसंकल्पी कागदपत्रांमध्ये न दाखवल्याने राज्यावरील एकूण कर्जाचा बोजा कमी दिसतो विधिमंडळाच्या अपरोक्ष हे करण्यात आले असल्याचा आक्षेपदेखील नोंदविण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगलीतील चार जण दहशतवाद्यांच्या संपर्कात

दहशतवादी संघटनेची सोशल मीडियावरून संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर राज्यभरातील पथकांनी एकाच वेळी कारवाईला केली.दरम्यान कोल्हापूर, कवठेमहांकाळ तासगाव मधील चौघांना पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. या चौघांनाही शहर न सोडण्याचे फक्त सूचना देण्यात आले आहेत.

पत्रकार परिषदेविनाच अधिवेशन गुंडाळलं! विरोधकांचा गंभीर आरोप,

: शनिवारी पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. मात्र, अधिवेशनानंतर सत्ताधारी पत्रकार परिषद घेत असतात विधीमंडळातील ही अलिखित परंपराच आहे.मात्र, यंदा पत्रकार परिषद न झाल्याने सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले जात आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजले. या अधिवेशनात १५७ तास कामकाज झाले.या अधिवेशनामध्ये अनेक विधेयके आली आणि त्यावरती चर्चाही झाली. काही विधेयकं घाईघाईमध्ये मंजूर देखील झाली.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून प्रस्थान

ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यातून प्रस्थान झाले. या सोहळ्यामुळे वाहतूकमध्ये बदल करण्यात आले आहे. हडपसर येथून पुण्याकडे येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com