Manoj Jarange : जरांगेंची प्रकृती खालावली, बसता येईना, आवाजही खालावला; सरकारला इशारा देत म्हणाले...

Manoj Jarange On Maratha Reservation : "...त्याशिवाय उपोषण मागे घेतलं जाणार नाही," असं जरांगेंनी म्हटलं आहे.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange ) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी ( 10 फेब्रुवारी ) तिसरं उपोषण सुरू केलं. आज सोमवारी ( 12 फेब्रुवारी ) जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. जरांगेंनी उपचारास नकार दिला असून, तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगेंना बसता येत नसून आवाजही खालावला आहे. अशातच जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. सग्यासोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, तर महाराष्ट्रात काय होतं, हे सरकारच्या लक्षात येईल, असं जरांगेंनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Manoj Jarange
Lok Sabha Election 2024 : हेमंत गोडसेंकडून लोकसभेचा प्रचार सुरू; पण भाजप अन् राष्ट्रवादीकडून गोंधळाचा प्रयत्न

मनोज जरांगे म्हणाले, "नोंद नसलेल्या मराठ्यांसाठी सगेसोयऱ्याचा कायदा आहे. त्यासाठी हैदराबाद गॅझेट स्वीकारण्याचं सरकारनं कबूल केलं होतं. त्यावर सरकारनं बोलावं. डबेवाले, माथाडी कामगार आणि मजुरांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. सगळ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी खंबीर आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय उपोषण मागे घेतलं जाणार नाही. 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन आहे. सग्यासोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबाद गॅझेट स्वीकारलं नाही, तर महाराष्ट्रात काय होतं, हे सरकारच्या लक्षात येईल. आम्हीही आंदोलनाचे टप्पे पाडले आहेत. विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्याच्या कायद्याबाबत अंमलबजावणी झाली नाही, तर मराठे मुंबईला जाणार," असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे.

यापूर्वी जरांगेंनी 29 ऑगस्टला २०२३ मध्ये पहिले उपोषण केलं होतं. ते १७ दिवस चालले. मग, २४ ऑक्टोबर २०२३ मध्ये दुसरं उपोषण केलं. ते ९ दिवस चाललं. आता पुन्हा १० फेब्रुवारी २०२४ ला जरांगेंनी तिसऱ्या उपोषणास सुरुवात केली आहे

Manoj Jarange
Sanjay Raut : "दाढी तुमची लंका जाळून टाकेल", CM शिंदेंच्या विधानावर राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले...

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलण्याचा राज्य सरकारचा निर्णय जवळजवळ निश्चित झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

R

Manoj Jarange
Abhishek Ghosalkar: वो कौन था? अभिषेक, मॉरिसच्या मृत्यूचे गूढ कायम...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com