'राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाटी कोरी. नुसत्या सभा गाजवून लोकांची पोटं भरत नाहीत, आणि समस्या सुटत नाहीत. आम्ही आठवड्याला ६००-७०० लोकांना भेटतो, सुख-दुःखात धावून जातो, म्हणूनच मुंबईकरांच्या हृदयात आम्हीच वसतो. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही, आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही ? ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं, त्यांचं राजकारण आता संपत आलं. तुम्ही कितीही करा युती, पण मुंबईत पेटणार नाही तुमची पणती,' अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.