Ambadas Danve News: देश शेतकऱ्यांचा आहे, की कारखानदारांचा ? दानवे मोदी सरकारवर भडकले..

Marathwada Political News: शेतकरी संघर्ष करत असतांना त्याला आणखी संकटात लोटण्याचे काम केंद्राच्या या निर्णयाने झाले.
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT : एकीकडे कापसाचे आयात शुल्क कमी करता आणि दुसरीकडे कांद्याचे निर्यात शुल्क वाढवता. हा देश शेतकऱ्यांचा आहे की,कारखानदारांचा ? असा सवाल करत देशातील केंद्र सरकार दुतोंडी असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोदी सरकारवर केली. (Ambadas Danve On Onion) एकीकडे लाल किल्ल्यावरून आणि मुंबईतून शेतकऱ्यांसाठी तोंड देखले पणा करायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्याचा जीव घेण्याचे काम धोरणाच्या माध्यमातून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Ambadas Danve News
Beed Politics News : दुसऱ्या पुतण्याला गळाला लावत अजितदादा संदीप क्षीरसागरांची डोकेदुखी वाढवणार !

कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. यामुळे कांद्याचे भाव पडतील आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. (Shivsena) केंद्राच्या या निर्णयाविरोधात शेतकरी (Farmers) रस्त्यावर उतरले आहेत, नाशिकच्या बाजारात कांद्याचा लिलाव बंद करत निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी देखील केंद्राच्या या भूमिकेवर टीका केली.

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दानवे यांनी वेरुळ येथील घृश्नेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी त्यांनी विविध प्रश्नांवर संवाद साधला. (Marathwada) एकेकाळी कांदा पन्नास पैसे किलोच्या दराने विक्री होत होता. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांसाठी साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, ते अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अशी परिस्थिती असताना आता पुन्हा काद्यावर निर्यात शुल्क लावण्यात आले आहे.

संपूर्ण मराठवाड्यामध्ये जवळपास सर्व ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे. काही ठिकाणी पेरणी झाली आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणी झाली. एकीकडे शेतकऱ्यांचा अंत सरकार पाहत आहे तर दुसरीकडे निसर्ग देखील शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. सरकारने जाहीर केलेले पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचे काय? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. या सर्व परिस्थितीशी शेतकरी संघर्ष करत असतांना त्याला आणखी संकटात लोटण्याचे काम केंद्राच्या या निर्णयाने झाले आहे.

मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही, त्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. चारा छावणी उभारावी अशी स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. मात्र, तशी स्थिती निर्माण झाली तर शिवसेना नक्कीच पुढाकार घेऊन चारा छावण्या उभारेल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना महाराष्ट्रातच नाही तर देशात मजबुतीने उभी राहील. त्यासाठी आपण घृश्नेश्वराच्या चरणी आम्हाला ताकद देण्याची प्रार्थना केल्याचेही दानवे यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com