

ZP election news : युवराज धोतरे
औसा विधानसभा मतदारसंघातील तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना सुनिल चौधरी यांचे अपहरण झाल्याची गंभीर घटना समोर आली. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शनिवारी सायंकाळी पाच वाजता अंजना चौधरी या बिदर रोड, उदगीर येथे त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर मतदारसंघात प्रचारासाठी जाण्याचे नियोजन होते. त्यांना घेण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते रणजीत कोकणे (रा. कासार बालकुंदा, ता. निलंगा) हे तेथे गेले होते.
हळदीकुंकवाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काही वेळाने कोकणे हे बाहेर जाऊन परत आले असता, अंजना चौधरी या त्या ठिकाणी नव्हत्या. नागरिकांकडून चौकशी केली असता, काही अज्ञात गुंडांनी एका वाहनातून जबरदस्तीने त्यांना घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कोकणे, पक्षाचे कार्यकर्ते व कुटुंबीयांनी चौधरी यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, चौधरी यांच्या निवासस्थानी चौकशी केली असता, त्यांचे पतीही घरी आढळून आले नसल्याने अपहरण झाल्याची शंका अधिक बळावली आहे. या घटनेबाबत काँग्रेस नेत्यांनी पोलीस प्रशासनाला माहिती देत तक्रार नोंदविली आहे. लातूर जिल्ह्यात ST प्रवर्गासाठी एकमेव राखीव विधानसभा मतदारसंघ असून, अनुसूचित जमातीचे जातपडताळणी पूर्ण झालेले उमेदवार मिळणे प्रत्येक पक्षासाठी आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत अधिकृत उमेदवाराचे अपहरण होणे ही घटना अत्यंत गंभीर व लोकशाहीला घातक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी काँग्रेस नेते अभय साळुंके व ॲड. किरण जाधव यांनी पोलीस अधीक्षक लातूर, मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करून, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी स्वतः लक्ष घालून अंजना चौधरी यांचा तात्काळ शोध घेऊन सुरक्षितपणे ताब्यात द्यावे, अशी मागणी केली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणारी असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
चौकशी सुरू
या प्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले असून या निवेदनाला अनुसरून या घटनेची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. यात सीडीआर तपासून नेमके हे काय प्रकरण आहे? याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतीतले काय सत्य आहे? ते समोर येईल, असे उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्ष राजकुमार पुजारी यांनी स्पष्ट केले.
FAQs :
1) अपहरण झालेली उमेदवार कोण आहेत?
👉 काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना सुनिल चौधरी यांचे अपहरण झाले आहे.
2) ही घटना कुठे घडली?
👉 औसा विधानसभा मतदारसंघातील तांबाळा जिल्हा परिषद गटात ही घटना घडली आहे.
3) अंजना चौधरी कोणत्या प्रवर्गातून निवडणूक लढवत होत्या?
👉 त्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून निवडणूक लढवत होत्या.
4) या घटनेचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची आणि राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे.
5) पोलिस तपास सुरू आहे का?
👉 होय, घटनेनंतर पोलिसांकडून तपास आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.