
Beed News : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमधील सुरेश धसांच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीबद्दल बोलताना त्यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट दिली होती.त्यावेळी त्यांनी मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आल्याची सांगितलं होतं.पण यानंतर धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) ट्विट करत मोठा खुलासा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे शुक्रवारी(ता.18) ट्विट केलं आहे.या ट्विटमध्ये त्यांनी मंत्री व त्यांचे सहकारी बाबासाहेब पाटलांचे (Babasaheb Patil) आभार मानतानाच दुसरीकडे आपल्या तब्येतीबाबत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही, असंही धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होत असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
याचवेळी त्यांनी बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभारही मुंडेंनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आभारही व्यक्त केले आहेत.
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री व परळीचे आमदार धनंजय मुंडेंबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आला होता,त्यांना नीट बोलताही येत नसल्याची दिली होती.
धनंजय मुंडेंची सध्या तब्येत ठीक नसून त्यांना बेल्स पाल्सी या आजाराच्या निदानानंतर अर्धांगवायूचाही झटका आला. त्यांचे डोळेही वाकडे झाले आहेत. त्यांना बोलताही येत नसल्याचं त्यांनी सांगितले. आमच्या पक्षाच्या महत्त्त्वाच्या मिटींगला ते मुंबईत येतात,काही कार्यक्रमांना हजेरी लावतात,जवळच्या व्यक्तींच्या आग्रहास्तव ते कार्यक्रमांना उपस्थित राहतात,असेही सहकारमंत्री यावेळी म्हणाले होते.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी एका कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करत ते पुन्हा पदावर यावेत आणि त्यांच्या हातून समाज कल्याणाचं काम घडावं, अशी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच महंत नामदेव शास्त्री काय बोलले याच्यावर मी बोलणार नाही, शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो. ते काहीही बोलले तरी आम्ही बोलणार नाही असं म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.