Manoj Jarange Patil News: जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार ? आठ मोठ्या घोषणा

Maratha Aarakshan: राजकीय नेत्यांना गावात पाय ठेवू न देण्याचा जरांगे पाटलांचा इशारा
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News: मराठा आरक्षणाचा प्रश्न आता आणखी तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत आंदोनालाची पुढील दिशा नेमकी कशी असणार, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत आठ मोठ्या घोषणा केल्या आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यास जरांगे पाटलांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, या अल्टीमेटमचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवरच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत 24 ऑक्टोबरच्या आत मराठा आरक्षणाचा निर्णय सराकारने घ्यावा, अन्यथा 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange News : तात्पुरती मलमपट्टी नको, कायमचा उपचार करा; अन्यथा, पेलणार नाही असं आंदोलन करू!

तसेच या उपोषणादरम्यान आपण पाणी देखील घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या बरोबरच राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात येणार असून पुढील आंदोलन राज्य सरकारला पेलणार नाही, असा थेट इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे.

तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न जो पर्यंत मार्गी लागत नाही, तो पर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका जरांगे पाटलांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात काय निर्णय घेतं, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

आंदोलनाची पुढील दिशा कशी असणार ?

  • राज्य सराकारने 24 तारखेच्या आधी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा.

  • अन्यथा 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा जरांगे पाटलांचा इशारा.

  • 25 ऑक्टोबरपासून कठोर उपोषण, पाणी देखील न घेण्याची जरांगे पाटलांची भूमिका.

  • मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तो पर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ न देण्याचा इशारा.

  • राज्यभरात सर्कल प्रमाणे 25 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय.

  • 28 ऑक्टोबरपासून साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्यात येणार.

  • प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात मराठा समाज कँडल मार्च काढणार.

  • पुढील आंदोलन सरकारला पेलणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

    Edited by Ganesh Thombare

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil PC : जरागेंचा एल्गार : सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम ; अन्यथा 25 तारखेपासून पुन्हा उपोषण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com