Manoj Jarange Indefinite Hunger Strike: सरकारला आणखी किती वेळ द्यायचा ? जरांगेचा राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल

Maratha Reservation राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंना फोन केला होता
Manoj Jarange Indefinite Hunger Strike
Manoj Jarange Indefinite Hunger Strike Sarkarnama

Jalna Aantarwali Sarati: वीस मिनिटांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटलांचा फोन आला होता. त्यावर मराठवाड्यात पुरावे सापडले असतील किंवा नसतील, ज्यांचे पुरावे सापडले त्यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला आरक्षण आणि प्रमाणपत्र द्यावे लागतील, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील सर्व कलेक्टरांना बोलवा आणि ज्यांचे पुरावे सापडलेत त्यांनाच नाही तर सरसकट सगळ्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्या, असेही मी त्यांना सांगितले असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी आज मराठा समाजाशी संवाद साधला.

या वेळी ते बोलत होते. अर्ध्या समाजाला आरक्षण द्यायचे आणि अर्ध्यांना नाही, असे असेल तर मी उपोषण थांबवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मी फोनवर त्यांना स्पष्ट बोललो आहे. त्यावर त्यांनी सर्व कलेक्टरांना बोलावण्याचे आश्वासन दिल्याचेही जरांगेंनी सांंगितले.

Manoj Jarange Indefinite Hunger Strike
Maratha Agitation : मराठा आरक्षणासाठी धनगर समाजाच्या सरपंचाने दिला राजीनामा; OBC बांधवांनीही केले मुंडण!

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला थोडा वेळ मागितला आहे. असे विचारले असता मनोज जरांगे म्हणाले, थोडा म्हणजे किती वेळ द्यायचा? आम्ही 40 वर्षे थांबलो. थोडा वेळ म्हणजे नेमका किती वेळ द्यायचा? आमच्या मराठ्यांचे मन खूप मोठे आहे. त्यांनी थोडा म्हणजे नेमका किती वेळ याचे उत्तर आधी द्यावे, मग आम्ही बघू, असं मनोज जरांगे म्हणाले.

आमचे शांततेतील आंदोलन त्यांनी पाहिले, पण अजून तिसरा टप्पा त्यांना बघायचा आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू झाले तर त्यांना बैठकाही घेता येणार नाहीत, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते, पण मुख्यमंत्री त्यांच्याशी मराठा आरक्षणाबाबत काही बोलले का, याबाबत त्यांचे काहीही उत्तर आलेले नाही, म्हणजेच त्यांनी आरक्षणाबाबत केंद्र सरकारला काहीही विचारलेले नाही."

"13 ऑक्टोबरलाच क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाली आहे. त्यानंतर 16 तारखेला आपण विचारलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते. तरीही आरक्षणाबाबत त्यांना काहीच सांगितले गेले नसेल, तर मग आम्ही विश्वास कसा ठेवायचा? पंतप्रधानांना काही माहीत असते तर त्यांनी शिर्डीत त्याबाबत नक्कीच उल्लेख केला असता, असेही जरांगेंनी स्पष्ट केले.

मराठ्यांचे आंदोलन भरकटलेले नाही; पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे लोक वाचाळ पद्धतीने बोलत आहेत, आधी त्यांनी त्यांच्या लोकांना आवरावे. आम्हाला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाही, पण त्यांना म्हणावे तुम्ही तुमची लोकं आवरा. आमची लोकं शांततेच आंदोलन करत आहेत. आमच्या वाट्याला जाऊ नका. हे शांततेचं युद्ध सरकारला परवडणार नाही, असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Manoj Jarange Indefinite Hunger Strike
Maratha Reservation News : कोल्हापूर जिल्ह्यातील 6 आमदारांची मराठा आरक्षण लढ्यात उडी; घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com