
Manoj Jarange Patil protest : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (ता.27) सकाळी पत्रकार परिषद घेत मराठ्यांना मुंबईत येण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आम्ही शांततेत मुंबईला येत आहोत, सणात अडचणी येऊ देणार नाही. आता देव-देवतांना पुढे करत आहेत, आता सांगून चार महिने झाले आहेत. आपल्याला अडवण्यासाठी नवीन कायदा काढला आणि तुम्ही परवानगी घेतली नाही असं सांगत आहेत.
दहशतवाद्यांसारखे डाव टाकले जात आहेत. पण न्यायालय आम्हाला न्याय देणार आहे, असं जरांगे म्हणाले. तर यावेळी बोलताना मनोज जरांगेंनी त्यांना सरकारच्या वतीने काल रात्री फोन आल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, "जे आहे ते सांगायचं आपल्या गरीबाचा पाठिराखा हे आहेत.
रात्री 10-11 च्या वाजण्याच्या सुमारास मला फोन आला. मुख्यमंत्रीसाहेबांच्या वतीने त्यांचं शिष्ठमंडळ भेटीला येणार आहे. शिवनेरीला ते भेटीला येतील. मात्र, मी मराठा समाजाला सांगून ठेवलंय, चर्चा होत असते चर्चेवर विश्वास ठेवायचा नाही, लेखी देतील त्यावरही विश्वास ठेवायचा नाही. आता थेट अंमलबजावनी झाली पाहिजे.", असं आवाहन त्यांनी मराठ्यांना केलं.
त्यामुळे आता काल झालेल्या मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जरांगे यांना मुंबईत येण्याआधीच रोखण्यासाठी आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी चर्चा सुरू केल्याची सरकारची रणनीती असल्याचंही बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.