Maratha Reservation : मनोज जरांगे 'धाराशिव'मध्ये प्रशासनाला आणणार अडचणीत?

Loksabha Election 2024 : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यासाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. मुंबईला आंदोलन करून सरकारची चांगलीच पळापळ केली होती.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama

Dharashiv Political News : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. मुंबईला आंदोलन करून त्यांनी सरकारची चांगलीच पळापळ केली होती.

त्यानंतर सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तो जरांगे यांनी फेटाळला असून, आता त्यांनी पुन्हा एकदा सरकार, प्रशासनाला टार्गेट करण्याचे ठरवलं आहे.

धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून (Maratha Community) नियोजन बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव (Dharashiv) मतदारसंघात मराठा समाजाने नवी रणनीती आखली आहे.

त्यासाठी प्रत्येक गावात एक उमेदवार उभा करण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. मात्र, त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.

Manoj Jarange
Vijayakumar Gavit: 'लोकसभेनंतर ठरवू कुठे जायचं ते'; भाजप मंत्र्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल; मानहानीचा गुन्हा दाखल करणार

मराठा समाजाला सरकाने फसवले असल्याचा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. आम्हाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नको आहे. दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या ५० टक्क्यांमध्ये देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, काही दिवसांपासून सरकार आणि जरांगे यांच्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून सरकारला अडचणीत आणण्याचा मनोज जरांगेंचा डाव आहे.

मनोज जरांगे यांनी दौरा करून मराठा समाजाची मते जाणून घेतली. त्यानंतर धाराशिवमध्ये (Dharashiv) मराठा समाजाकडून नियोजन बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाने धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

त्यासाठी प्रत्येक गावात एक उमेदवार उभा करण्याचा निर्धार केला आहे. तसेच भूम येथे बैठकांचे सत्र सुरू केले आहे. सावरगाव येथे बैठक घेऊन गावातून 3 उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीने होणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठी मराठा समाज धाराशिवमधून 1 हजार उमेदवार उभे करणार आहे.

384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर (Balot Paper) निवडणूक घ्यावी लागते. मराठा समाजाकडून मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले गेल्यास धाराशिवमध्ये प्रशासनाला वेगळीच तयारी करावी लागणार आहे. नेमका हाच डाव मराठा समाजाकडून साधला जाणार आहे.

विराट मूक मोर्चा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर जरांगे यांनी बिनधास्त चौकशी करा असे सांगितले आहे.

पण या चौकशीविरोधात परभणीत 11 मार्च रोजी सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. परभणीत सकल मराठा समाजाकडून (Sakal Maratha Samaj) आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

R

Manoj Jarange
Prakash Abitkar: कोल्हापूरसाठी राज्य सरकारचा विशेष अध्यादेश, आबिटकरांच्या पाठपुराव्याने या शेतकऱ्यांना होणार लाभ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com