Parbhani News, 21 Mar : सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi Death Case) यांच्या मृत्युला पोलिसच जबाबदार असून त्यांना परभणीतील नवा मोंढा पोलिस ठाण्यात मारहाण करण्यात आली होती, असा निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नोंदवलं आहे. तर सुर्यवंशी यांच्या मृत्युला पोलिस कारणीभूत असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणीचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे. आयोगाने या प्रकरणाशी संबंधित सर्व पोलिसांना (Police) नोटीस धाडून उत्तर मागितलं आहे. तर सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशीनंतर काढला आहे.
परभणीत (Parbhani) संविधान अवमानाच्या निषेधार्थ दलित संघटनांनी 11 डिसेंबर 2024 रोजी आंदोलन केलं होतं. यावेळी आंदोलकांनी काही ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली होती. यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचाही समावेश होता.
त्यानंतर 14 डिसेंबर रोजी आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर 15 डिसेंबरला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोमनाथ यांच्या छातीत त्रास झाल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचं तुरुंग प्रशासनाने सांगितलं होतं.
मात्र, पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कुटुंबियांनी पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. या मृत्यू प्रकरणी न्यायदंडाधिकारी सी. यू. तेलगावकर यांनी केलेल्या चौकशीचा गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगात दाखल करण्यात आला आहे. या अहवालात पोलिसच सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तर या प्रकरणाची पुढील सुनावणी आयोगाने 23 जूनला ठेवली आहे. दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युप्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यांचा मृत्यू नसून हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांसह आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी केला होता. त्यानंतर या हत्येला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी अनुयायांनी जानेवारी महिन्यात परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च देखील काढला होता.
त्यानंतर दबाव वाढल्यानंतर तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं. तर या प्रकरणात काही शंका उपस्थित झाल्या आहेत, त्याच निरसन करण्यासाठी सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणाची न्यायलयीन चौकशी केली जाईल, असं राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं होतं.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.