Sambhaji Patil Nilangekar : विरोधकांच्या अपप्रचारामुळे आमचा पराभव, निलंगेकरांनी सांगितली कारणं...

Latur Lok Sabha Elections : लातूर लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीकडून दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदिनिशी व प्रामाणिकपणे पार पाडली आहे. जिल्ह्याचा संयोजक म्हणून आम्हाला मतदारानी दिलेला कौल शिरसंवाद मानून हा कौल विनम्रपणे स्वीकारतो 
Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil NilangekarSarkarnama

राम काळगे

Nilanga News : लातूर लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीकडून दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदिनिशी व प्रामाणिकपणे पार पाडली आहे. जिल्ह्याचा संयोजक म्हणून आम्हाला मतदारानी दिलेला कौल शिरसंवाद मानून हा कौल विनम्रपणे स्वीकारत असल्याचे मत माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी शुक्रवारी  पत्रकार परिषदेत सांगितले. शिवाय यशाच श्रेय घेण्यासाठी अनेक जन पुढे येतात मात्र अपयश पचवायला व स्वीकारायला तेवढीच हिम्मत व मनोबल लागते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार निलंगेकर म्हणाले,  एनडीएने चारशे पारचा नारा दिला होता त्यामुळे मागासवर्गीय मतदारात चाराशे पार झाल्यानंतर संविधान बदलणार आहेत. या भावनिक मुद्द्यावर विरोधकाकडून अपप्रचार करण्यात आला होता. हा अपप्रचार खोडण्यात आम्ही कमी पडलो. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव, मराठा आरक्षण, याचाही परिणाम झाल्याचे या निवडणूक निकालातून स्पष्ट झाल्याचे त्यानी कबुल केले.

भारतीय जनता पार्टीने दिलेला उमेदवार हा आमदार अभिमन्यू पवार व आमदार रमेश कराड यांनी दिलेला होता. तरीही ते प्रचारात दिसले नाहीत याबद्दल आपले मत कायअसे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, पक्षाने दिलेला उमेदवार हा उमेदवारी जाहीर होण्यापर्यंत गटातटाचा उमेदवार म्हणून समजले जाते. परंतु केंद्रीय नेतृत्वाने उमेदवार जाहीर केल्यानंतर तो उमेदवार कोणत्याही गटातटाचा नसतो भाजपाचे कमळ हेच पक्षाचे चिन्ह असल्याने चिन्ह हेच उमेदवार आहे. असे आपण वेगवेगळ्या जाहीर सभेत वारंवार जाहीरपणे सांगितले आहे. तरीही याबद्दल निवडणूक प्रमुख म्हणून  महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारततो असेही त्यानी सांगितले.

लातूर शहर व ग्रामीण विधानसभा मतदार संघात मोठे मताधिक्य मिळणार होते. परंतु आम्ही ते रोखण्यात यशस्वी झालो पूर्ण ताकदिने आपण तिथे प्रयत्न केले असून त्यामुळेच काँग्रेसकडून प्रचंड मताधिक्य मिळणार म्हणून उठवलेल्या वावड्याचे प्रतिउत्तर कमी मताधिक्याने मिळाले आहे. मी लातूर, उदगीर, अहमदपूर या मतदार संघात अधिक वेळ दिला. 

कार्यकर्त्यांनीही केंद्रामधील नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपली जागा निश्चितच निवडून येणार म्हणून अति आत्मविस्वासाने राहिले म्हणूनच निलंगा मतदार संघामधून काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळाले त्याच बरोबर काँग्रेसचा उमेदवार हा राजकीय पार्श्वभूमी असलेला होता. शिवाय निलंगा मतदार संघातील भूमिपुत्र म्हणून प्रचार झाल्याने याचा परिणाम मतदारावर झाल्याने त्याना मतदार संघातून मताधिक्य वाढले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

Sambhaji Patil Nilangekar
Ajit Pawar : भाजपचा खडकवासला दादांचा झालाच नाही ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com