

Beed News, 24 Dec : बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडने औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला आहे. या याचिकेवर सुनावणी घेत खंडपीठाने पुढील सुनावणी १५ जानेवारी रोजी ठेवली आहे.
मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने औरंगाबाद खंडपीठात दोषमुक्त करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. आपल्यावर मकोका लावता येत नाही, देशमुख यांच्या हत्येशी माझा संबंध नाही, ‘मकोका’ लावण्यासाठी मागील दहा वर्षांत गुन्हे दाखल नाहीत आणि संघटीत गुन्हेगारीचा सदस्य नसल्याच्या मुद्द्यावर कराडने दोषमुक्ती अर्ज सादर केला.
या अर्जावर मंगळवारी खंडपीठात न्या. संदीपकुमार मोरे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीचे वकील उपस्थित नसल्याने खंडपीठाने पुढील सुनावणी 15 जानेवारी रोजी ठेवली आहे. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. झेड. एच. फारुकी आणि ॲड. धनंजय पाटील यांनी काम पाहिले.
विशेष म्हणजे आजच बीडच्या विशेष मोका न्यायालयात वाल्मीक कराडसह इतर आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले आहे . विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी वाल्मीक कराड यांच्यासह सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि आत्या प्रकरणातील इतर आरोपींवर खटला पुढे ढकलण्यासाठी केल्या जाणाऱ्या युक्त्यांवर भाष्य केले होते.
सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अवादा कंपनीकडून वाल्मीक कराड आणि त्याच्या खंडणी प्रकरणातून अपहरण करत अमानुष हत्या केली होती. या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे . वर्षभरानंतर या प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात यश आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.