Ambadas Danve On Devendra Fadnavis : साताऱ्यात अंमली पदार्थाचा कारखाना, राज्याला उडता महाराष्ट्र का म्हणू नये? अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Satara Drug Factory : साताऱ्यात एमडी ड्रग्स कारखाना उघडकीस आल्यानंतर अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला. वाढती ड्रग्स तस्करी पाहता महाराष्ट्र ‘उडता महाराष्ट्र’ होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
Ambadas Danve, CM Devendra Fadnavis
Ambadas Danve, CM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : गेल्या अनेक महिन्यापासून राज्याच्या विविध भागात अंमली पदार्थांची तस्करी, त्याचे सेवन अन् कारखाने असे प्रकार उघडकीस येत आहेत. तुळजापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात एमडी ड्रग्स आणि त्यातून अनेक वाईट घटना घडल्या आहेत. यावरून विरोध पक्षांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीकास्त्रही सोडले.

आता साताऱ्यात एमडी ड्रग्स तयार करणारा कारखाना उजेडात आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत. अंमली पदार्थाची वाढती तस्करी, उघडकीस येणारे कारखाने, नशेच्या आहारी गेलेली तरूणाई आणि त्यातून घडनारे गुन्हे, खून आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंचेचा विषय ठरत आहे.

अंमली पदार्थांमुळे जशी पंजाब राज्याची प्रतिमा देशपातळीवर मलीन झाली आणि यामुळे 'उडता पंजाब' म्हणून हे राज्य ओळखले जाऊ लागले. तशीच परिस्थिती महाराष्ट्राची होऊ घातली आहे. मग महाराष्ट्रालाही उडता महाराष्ट्र का म्हणू नये? असा सवाल अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला आहे. या निमित्ताने पुन्हा काही प्रश्न दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहेत.

Ambadas Danve, CM Devendra Fadnavis
Gopichand Padalkar On Sharad Pawar Bharat Ratna demand : शरद पवारांना भारतरत्न द्या, खासदार लंकेंची मागणी; पडळकर म्हणाले, 'काय मंडळाचा..!'

साताऱ्यात एमडी ड्रग्स तयार करणारा कारखाना उजेडात आला आहे. गृहमंत्री म्हणून जनतेच्या वतीने आपल्याला याबाबत काही प्रश्न आहेत देवेंद्र फडणवीस जी, असे म्हणत महाराष्ट्राला यामुळे 'उडता महाराष्ट्र' का म्हणू नये? असा टोला दानवे यांनी लगावला आहे. या शिवाय साताऱ्यातील कारखान्याचे मुंबई-पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकार मधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आहे, हे सत्य आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

Ambadas Danve, CM Devendra Fadnavis
Eknath Shinde: "पुढील दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री"; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

एका विशिष्ट पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे, म्हणून या कारखान्याला अभय होते काय? मुंबईतील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात, सातारा पोलीस याबाबत गप्प कसे होते? आणि म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती? असे प्रश्न अंबादास दानवे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com