Mumbai Bomb Blast : मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडले होते. पण या धक्कादायक निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच निकालाला आता स्थगिती दिली आहे.
मात्र स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने कोठडीतून बाहेर आलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. या आरोपींना पुन्हा अटक करून तुरुंगात टाकण्याची अशी मागणी राज्य सरकारने केली नाही. हे आरोपी बाहेर राहण्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे हे आरोपी सध्या तरी तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. पण या आरोपींना एका महिन्यातआ आपलं म्हणणं सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पण या सगळ्या निर्णयाचा परिणाम इतर मकोका खटल्यांवर होतो. या खटल्याचा संदर्भ कनिष्ठ न्यायालयांकडून अर्थ लावण्यासाठी घेतला जाऊ शकतो, असा युक्तिवाद राज्य सरकारकडून करण्यात आला होता. यावर या खटल्याचा संदर्भ इतर मकोका खटल्यांसाठी घेऊ नये असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबईमध्ये 11 जुलैला 2006 मध्ये उपनगरीय रेल्वेत 11 मिनिटांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. वांद्रे, माटुंगा रोड, माहिम जंक्शन, खार रोड, जोगेश्वरी, भाईंदर आणि बोरिवली हे परिसर स्फोटाने हादरले होते. यात तब्बल 209 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 जण जखमी झाले होते. सत्र न्यायालयाने या प्रकरणात तब्बल 12 जणांना दोषी ठरवले. यात 5 जणांना फाशीची तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.