BJP Government Favoritism: बागल, विखे पाटलांवर फडणवीस सरकारची मेहेरबानी; अशोक पवार, थोपटेंना पुन्हा डावलले

Political Appointments in Maharashtra:राष्ट्रीय सहकार निगम अर्थात एनसीडीसीमार्फत महाराष्ट्रातील आणखी दोन कारखान्यांना तब्बल 436 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे.
Mahayuti
MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News: राष्ट्रीय सहकार निगम अर्थात एनसीडीसीमार्फत महाराष्ट्रातील आणखी दोन कारखान्यांना तब्बल 436 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. या कर्जाला राज्य शासनाची थकहमी देण्यास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. अहिल्यानगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला 296 कोटी आणि करमाळ्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याला 140 कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे.

हे दोन्ही कारखाने भाजप नेत्यांशी संबंधित आहेत. यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात आहे. तर मकाई सहकारी साखर कारखाना भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याकडे आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्या राजगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या घोडगंगा कारखान्याला कर्ज मंजुरीपासून पुन्हा डावलले आहे.

Mahayuti
Waqf Amendment Bill : 'वक्फ' विधेयकावर सरकारची अग्निपरीक्षा? भाजपकडे नाही बहुमत; काय आहे लोकभेतील 'नंबर गेम'?

यापूर्वी विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 13 साखर कारखान्यांना 1 हजार 898 कोटी रुपयांचे 'मार्जिन लोन' उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला सत्ताधाऱ्यांशी संबंधित आणखी नऊ कारखान्यांना 1100 कोटी रुपयांच्या कर्जाला थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. लाभार्थ्यांमध्ये भाजपच्या तीन शिवसेनेच्या तीन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आणि काँग्रेसशी संबंधित एका नेत्याच्या कारखान्याचा समावेश होता. आता आणखी दोन सत्ताधारी नेते शासनाच्या थकहमीचे लाभार्थी ठरले आहेत.

Mahayuti
Santosh Deshmukh Murder : अखेर सुदर्शन घुले फुटला; जबाबात प्रतिक घुलेपासून सगळ्यांचे कारनामे सांगितले!

कमी व्याजाने मिळते कर्ज :

राष्ट्रीय सहकार निगमकडून हे कर्ज कमी व्याज दराने मिळते. या कर्जाच्या परतफेडीची मुदत दहा वर्षे असते. त्यातही पहिले दोन वर्षे या कर्जाचे हप्ते कारखान्यांना भरावे लागणार नाहीत. केवळ ज्या कारणांसाठी हे कर्ज दिले, त्याच कारणासाठी ते वापरण्याची अट असते.

मात्र या रकमेतून कारखान्यांना अन्य ठिकाणाहून जादा दराने घेतलेल्या कर्जाची परत फेड करण्याची संधी आहे. जिल्हा बँकेकडून 11 टक्के व्याजने कर्जे दिली जातात. ती कर्जे या रकमेतून परत केल्यास कारखान्यांवरील कोट्यवधी रुपयांचा व्याजाचा भुर्दंड कमी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com