Shaktipeeth Expressway : 'फितुरीचा फटका शिवाजी, संभाजी महाराजांना'; सतेज पाटलांनी आता शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांच्या काळजालाच हात घातला

Farmers Mumbai Azad Maidan Shaktipeeth Expressway Congress Satej Patil Kolhapur : शक्तीपीठ विरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राजव्यापी बैठक झाली.
Congress Satej Patil
Congress Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना देखील फितूरांचा फटका बसला होता. तुम्हाला फितूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आता मागे हटायचं नाही. जिल्ह्यातील आमदार खासदारांची शक्तीपीठ महामार्गाबद्दल लेखी भूमिका एक मार्चपर्यंत घ्यावी किंवा स्पष्ट करावी.

प्रत्येक जिल्ह्यातील सत्ताधारीतील एक विरोधाची भूमिका घेईल आणि एक समर्थनाथाची भूमिका आहे. आंदोलन मोडण्याचा प्रयत्न होईल. पण हा प्रकल्प शेतकऱ्यांना दिशोधडीला लावेल, असा घणाघात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी दिला.

शक्तीपीठ विरोधात काँग्रेस (Congress) नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राजव्यापी बैठक झाली. या राजव्यापी बैठकीला 12 जिल्ह्यातून शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते. अधिवेशनच्या काळात बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुंबईत मोर्चा धडकणार आहे. 12 मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर शक्तीपीठाविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

Congress Satej Patil
Sharad Pawar News : एक ना दोन, तब्बल 42 वर्षे सावली बनून साथ देणाऱ्या सहकाऱ्याचं निधन; शरद पवारांची भावनिक पोस्ट

जवळपास 12 जिल्ह्यातून 800 किलोमीटरचा रस्ता केला जाणार आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील रस्ता रद्द करण्यात आला. पण मधला 100 किलोमीटरचा रस्ता रद्द करता येत नाही. ही कोल्हापूरकरांची फसवणूक आहे. प्रकल्प रद्द करण्याचा आदेश संपूर्ण प्रकल्पासाठी निघाला होता. पण केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ता रद्द करण्यात आला. आता सुटलो म्हणून कोल्हापूरकरांना बोलून चालणार नाही. पण हा रस्ता सांगलीपर्यंत येतोय म्हणजे कोल्हापूर लादण्यावर सरकार मागे पुढे बघणार नाही, असा आरोप देखील यावेळी आमदार सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला.

Congress Satej Patil
Mumbai APMC : एकनाथ शिंदेंची 'गज चाल'; आशियातील मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर भगवा फडकवण्याची तयारी

सत्ताधारी मंडळाची हीच भूमिका आहे. आंदोलनातील माणूस आमचाच आणि विरोधकातील माणूस आमचाच. विरोध फोडण्यासाठी ही सत्ताधाऱ्यांची रणनीती आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात शक्तीपीठ होणार नाही, तर एक आमदार म्हणतात की शक्तीपीठ झाला पाहिजे. त्यामुळे खडा टाकून पाहिला जात आहे. विरोध करायचा असेल, तर पैशाचा विचार करू नका. हा रस्ता ठेकेदारांच्या धार्जिणेसाठी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्य धोक्यात येणार आहे. कोणाचे तरी सिमेंट स्टील घ्यायचाय, यासाठी हा रस्ता लादला जात असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला.

महाराष्ट्राची काळजी सत्ताधाऱ्यांना नाही

त्यामुळे गाफील राहून चालणार नाही निश्चित धोरण आखले पाहिजे. पालखी मार्गाला जुने रस्ते जोडले तर हा पर्याय असू शकतो, पण सरकार यासाठी प्रयत्नशील नाही. न्यायालयाचा अनुभव आम्हाला आलेला आहे. राष्ट्रवादीचे चिन्हं शरद पवारांना मिळालेले नाही. त्यामुळे तुमच्यातीलच माणूस सत्ताधारी कोर्टात पाठवतात. हा विरोध मोडण्यासाठी तुमच्यातीलच एक माणूस फितूर केला जाईल आणि त्याला न्यायालयात पाठवलं जाईल. त्यामुळे वेळीच सावध व्हा, असेही सतेज पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com