

Solapur, 16 July : श्रीकृष्ण हे मुस्लिम होते, ते पाच वेळा नमाज पठण करत होते, असे वादग्रस्त विधान करणारे मौलाना जर्जिस अन्सारी यांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला आहे. असे विधान करणाऱ्या मौलानाला आधी ठोकला पाहिजे, त्याचा पहिला डीएनए तपासला पाहिजे, त्यात तोसुद्धा हिंदूच असल्याचे आढळून येईल, असा दावा पडळकर यांनी केला आहे.
भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या विधानावर भाष्य केले. ते म्हणाले, श्रीकृष्णाबद्दल असं विधान करणाऱ्याा त्या मौलानाला आधी ठोकला पाहिजे. त्याचा पहिला डीएनए तपासला पाहिजे. त्याचा DNA तपासला तर लक्षात येईल, तोसुद्धा हिंदूच आहे
श्रीकृष्ण कोण आहे, हे सर्व जगाला माहिती आहे. कोणीतरी मौलानाने बोलावं आणि त्यावर आम्ही व्यक्त व्हावं, अशी गरज वाटतं नाही. परंतु त्या मौलानाचा डीएनए तपासल्यावर तो मौलानाच 24 तास कृष्ण मंदिरात बसेल, असा दावाही गोपीचंद पडळकर यांनी केला.
सोलापूरमध्ये एटीएसने केलेल्या कारवाईसंदर्भात पडळकर म्हणाले, एटीएसने राज्यात मोठ्या प्रमाणात 100 तरुणांची तपासणी केली आहे. चुकीचं वागणाऱ्यांवर एटीएसने कारवाई केली आहे. अशी भडवेगिरी कोणी करत असेल तर त्यांना ठोकून काढलं पाहिजे. देशाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकांना ठोकून काढलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे.
संजय राऊत यांच्या रामरक्षा आंदोलनासंदर्भात पडळकर म्हणाले, संजय राऊत याला एवढी अक्कल पाहिजे की प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणं आणि सत्ता स्थापन केली. आता तुम्हाला राम आठवतोय का?
ज्यांनी रामाचं अस्तित्व मान्य केलं नाही, त्यांच्या सोबत बसायचं आणि आता असली आंदोलन करायची.. लोक सगळं बघतायत. प्रभू रामचंद्रांबद्दल तुमची बदललेली भूमिका ही लोकांनी अनुभवलेली आहे. संजय राऊत काय बोलतायत, याला काही फार महत्व नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमीर खानच्या मुद्यावर नीतेश राणेंना पाठिंबा
गोपीचंद पडळकर म्हणाले, आमिर खाने याने तीन लग्न केली, तीनही हिंदू महिलांसोबत केली. अमीर खानचा अजेंडा ठरवून चालेला आहे. नीतेश राणे म्हणाले आमिर खान लव्ह जिहादचे ब्रँड अम्बॅसिडर आहे आणि हा तसाच प्रकार आहे. काही लोक त्यांना फॉलो करतात, त्यांनी असंच करावे अशी त्यांची भावना दिसतंय. त्यामुळे त्यांच्याबद्दल हिंदू धार्मियांच्या मनात मोठा राग निर्माण झाला आहे. राज ठाकरे त्यांच्या लग्नाला का गेले, ते त्यांनाच माहिती.
आम्हाला आमदार निवास मिळेना
सचिन अहिरांना बंगला न मिळाल्याबद्दल ते म्हणाले, ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत, ते ही अडचण सोडवतील. आता आम्हाला आमदार निवास नाही. मनोरा आमदार निवास पाडल्यामुळे असे अनेक आमदार आहेत की ज्यांना स्वतःला आमदार निवास नाही. कोणाला फ्लॅट, बंगला द्यायचा, हे त्या त्या परिस्थितीनुसार ठरते.