Abu Azmi : आबू आझमींचे मोठे विधान; ‘राज अन्‌ उद्धव एकत्र आले तर शिवसेनेची ताकद....’

Raj & Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्रात जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे.
Abu Azmi-Raj Thackeray-Uddhav Thackeray
Abu Azmi-Raj Thackeray-Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 June : राज आणि उद्धव ठाकरे एकाच घरात जन्माला आले आहेत, त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र आले तर त्यात आम्हालाही आनंद आहे. राज ठाकरेंची काही ताकद नाही ते फक्त द्वेषाचे राजकारण करतात. राज ठाकरे हे दररोज हिंदी किंवा उत्तर भारतीयांच्या विरोधात आणि हिंदी विरोधात बोलणे हाच त्यांचा धंदा आहे. राज आणि उद्धव एकत्र आले, तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते, असा दावा समाजवादी पार्टी प्रदेशाध्यक्ष आबू आझमी यांनी केला आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आबू आझमी यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले. हिंदी भाषा सक्तीचे आमदार आझमी यांनी स्वागत केले. ते म्हणाले, संसदेत एक कमिटी आहे, भाषेच्या नावावर 45 मेंबर आहेत, ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचे पूर्ण काम हिंदीतून असतं.

महाराष्ट्रात जर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश असायला पाहिजे. महाराष्ट्रात जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे, असा सवालही आबू आझमी (Abu Azmi) यांनी केला.

मनसेचे बाळा नांदगावकर हे जनतेला घुमराह करत आहेत. जनतेत असं बोलून फक्त मतदान घेतात. मनसेचे 14 आमदार निवडून आले होते, आता ते झिरो झाले आहेत. माझे शिक्षण इथे (महाराष्ट्रात) झाले नाही तरीही मी मराठीसाठी प्रयत्न करतो. मी मराठीची इज्जत करतो. मराठीचा सन्मान झाला पाहिजेर; पण हिंदीचा अपमान होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.

मराठी का मुद्दा होता है क्या? फालतू बाते करते है. महाराष्ट्रत राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात. कोणीही मराठीचा द्वेष करत नाहीत. एक भाषा असी असली पाहिजे की, कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तिचा सन्मान झाला पाहिजे. तसेच राज्य भाषेचाही सन्मान झाला पाहिजे, अशी अपेक्षा आबु आझमी यांनी व्यक्त केली.

शरद पवार एक मोठे नेते आहेत. शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली, ती फक्त ईडी आणि इन्कम टॅक्स यांच्यामुळे सोडली आहे, असेही आबू आझमी यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com