

Solapur News: सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाकडून तीव्र विरोध झाल्यानं त्यांचा पक्षप्रवेश वेटिंगवर ठेवला होता. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांना पक्षप्रवेशाची ऑफरही देऊ केली होती. दिलीप माने यांच्या प्रवेशाला प्रचंड विरोध करण्यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्ते (सुभाष देशमुख गट) रस्त्यावर उतरल्यामुळे ऐनवेळी भाजपनं मानेंचा प्रवेश थांबवला होता. पण,आता महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच दिलीप मानेंचा (Dilip Mane) भाजप पक्षप्रवेश करुन घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. एकाचवेळी मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील,माजी आमदार यशवंत माने आणि माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे बुधवारी (२९ ऑक्टोबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा दबदबा असलेल्या तीनही नेत्यांचा भाजपप्रवेश झाला होता.
पण याचवेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही प्रवेश लवकरच होणार होता.मात्र, आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या विरोधामुळे त्यांच्या प्रवेशाला सध्या तरी ब्रेक लागला आहे.या पक्षप्रवेशामुळे आता सोलापूर भाजपमध्ये नव्या वादाला तोंड फुटल्याचं बोललं दिसून येत आहे. तीव्र विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश दिल्यानंतर आता सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाषबापू देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे.
आमदार सुभाष देशमुख म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांचा दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला आणि महापालिकेतील उमेदवारीच्या भागीदाराला विरोध होता. आता पक्षाने प्रवेश दिला.मतदार काय ते ठरवतील,असा इशारा त्यांनी दिला आहे. दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी रात्री बोलणे झाले.कार्यकर्त्याकडे नागरिकांनी या प्रवेशाबद्दल नकारात्मक भावना व्यक्त केल्याचंही देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
सुभाष देशमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी बोलायला सांगितले होते. यावेळी मी त्यांना माने यांना प्रवेश देऊ नये. आमच्यात भागीदार आणू नका,असे कार्यकर्त्यांचे मत असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. आमच्यात मानेंच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी बोला असं म्हटलं होतं.
यानंतर आपण गुरुवारी सकाळी रवींद्र चव्हाण यांच्याशी बोललो. त्यांच्याही कानावर नागरिकांची नकारात्मक भावना कानावर घातली.यावेळी चव्हाण यांनी आपल्याला पक्षप्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असं मुख्यमंत्री अन् त्यांनी ठरवलं असल्याचंही सांगितलं.
पण मग मी त्यांना उमेदवारी देणार नसाल तर पक्षप्रवेश कशासाठी केला जातोय अशी विचारणा केली. यावर प्रदेशाध्यक्षांनी तुमचा निरोप मुख्यमंत्र्यांना कळवतो, असं म्हटलं. पण यानंतर तासाभरातच दिलीप माने यांचा प्रवेश झाल्याचं माध्यमांमधून सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.