Kolhapur Politics : हद्दवाढीचा फटका! झेडपी जिंकली तरीही 'या' उमेदवारांना नव्या निवडणुकीला सामोरं जावं लागणार

Kolhapur City Limit Expansion : शहर परिसरातील कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, बालिंगा, पाडळी खुर्द, सरनोबतवाडी आणि उचगाव या गावांचा समावेश कोल्हापुरात केला जाणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडून संबंधित गावांकडून ठराव घेतले जाणार आहेत. हे ठराव घेऊन नगर विकास विभागाकडे पाठवल्यानंतर हद्दवाडीचा निर्णय होणार आहे.
Local body elections Maharashtra
Local body elections MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 16 Jul : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी त्यानंतरच महानगरपालिका निवडणुकीत घेण्यात यावी, अशी मागणी शहर हद्दवाढ कृती समितीने केली आहे. मात्र या मागणीला विरोध करत कोल्हापूर शहरात येणाऱ्या आठ गावातील ग्रामस्थांनी शहराच्या हद्दवाढीला विरोध केला आहे.

तत्पूर्वी प्रशासनाकडून नामी शक्कल लढवत या संपूर्ण मार्ग जिल्हा परिषदेच्या नवीन प्रभाग रचनेनुसार काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. शहर हद्दवाढीच्या यादीत असलेल्या आठ गावांत जिल्हा परिषदेकडून निवडणूक झाली, तरीही हद्दवाढीनंतर पुन्हा महापालिकेची निवडणूक होणार आहे.

जिल्हा परिषदेकडून पंचवार्षिक निवडणुकीसाठी गण-गटानुसार प्रभाग रचना झाली आहे. दरम्यान शहराचा हद्दवाढ हा प्रामुख्याने राजकीय प्रतिनिधींचा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे सहाजिकच हा फटका सोसायचा कोण? असा सवाल उपस्थित झाल्याने या सर्व घडामोडीवर नेत्यांनी बोलायचं टाळलं आहे.

शहर परिसरातील कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, बालिंगा, पाडळी खुर्द, सरनोबतवाडी आणि उचगाव या गावांचा समावेश कोल्हाsasपुरात केला जाणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडून संबंधित गावांकडून ठराव घेतले जाणार आहेत. हे ठराव घेऊन नगर विकास विभागाकडे पाठवल्यानंतर हद्दवाडीचा निर्णय होणार आहे.

Local body elections Maharashtra
Imtiaz Jaleel News : संजय शिरसाट यांच्या खात्यामध्ये दीड नाही दोन हजार कोटींचा घोटाळा! मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदाराचाही सहभाग

मात्र तत्पूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक थांबवणे शक्य नाही. त्याला बराच कालावधी लोटणार आहे. त्यातच ही निवडणूक घेतली जावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे असल्याने शासनाला देखील ही निवडणूक घ्यावी लागणार आहे. शहराची हद्दवाढ होईल तेव्हा होईल, मात्र जिल्हा परिषदेकडून नवीन मतदारसंघ घोषित करण्यात आले आहेत.

ज्या आठ गावांचा समावेश हद्दवाढीत करण्यात येणार आहे, तेथेही निवडणूक प्रक्रिया होईल. मात्र, ज्यावेळी हद्दवाढीत ही गावे शहरात येतील, त्यावेळी पुन्हा त्या गावांमध्ये महापालिकेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या गावातील विजयी उमेदवारांचे अस्तित्व केवळ काही कालावधीसाठी असणार आहे. हद्दवाढीसाठी महापालिका आयुक्तांकडून जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकाऱ्यांकडे हद्दवाढीतील गावांची यादी देण्यात आली आहे.

Local body elections Maharashtra
Deepak Tilak : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

जिल्‍हा परिषद प्रशासनाकडून गण-गट पद्धतीने प्रभाग रचना करण्याचे काम सुरू झाले. मात्र, ज्या गावांत हद्दवाढ होणार आहे, त्यांच्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक कशी घेत आहे. ही गावे हद्दवाढीत गेल्यानंतर तेथील पदाधिकारी नगरसेवक होणार काय, असे अनेक प्रश्‍न आता पुढे येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये याबाबत संभ्रमावस्था आहे.

जी गावे हद्दवाढ प्रस्तावात समाविष्ट आहेत, त्या गावांत सध्या सुरू असलेली जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील. तेथील निवडणूक ही नियमाप्रमाणे होईल. ज्यावेळी हद्दवाढीचा निर्णय होईल. त्यावेळी त्या गावांत पुन्हा नगरसेवक पदासाठी महापालिका निवडणूक घेईल. हद्दवाढीच्या प्रस्तावामुळे जिल्हा परिषेदकडील निवडणूक प्रक्रिया थांबणार नसल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com