Manoj Jarange Patil : ''सध्या बिनकामाची कळपं एकत्र येतायत''; जरांगे पाटलांचा ओबीसी नेत्यांवर निशाणा!

Maratha and OBC Reservation : ''सध्या मराठ्यांना चारही बाजून घेरले जात आहे, मात्र...'' असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ द्यावा, या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी मनोज जरांगेंनी उपोषण केले, त्याच अंबड येथे शुक्रवारी ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा पार पडली. याला उत्तर देताना सांगलीतून जरांगे पाटलांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : आणखी एक आत्महत्या; सरमकुंडीत विनोद गायकवाड यांनी संपवले जीवन!

अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली, तर या नेत्यांना कळप असा उल्लेख करत जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ''मराठा समाजाला ७० वर्षांपासून चारही बाजूने घेरले आहे. हा वेढा तोडण्यासाठी आपल्यात एकी ठेवावी लागणार आहे. आरक्षण असलेले आणि नसलेल्या मराठ्यांना सर्वांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत एकत्र यावे. कारण राज्यातील बिगर कामाची कळपं एकत्र येऊ लागली आहेत. मात्र, ५०-६० टक्के असलेल्या मराठा समाजाला भीतीची काही गरज नाही. कितीही कळपं येऊ द्या," असा इशाराही जरांगेंनी ओबीसी नेत्यांना दिला आहे.

याशिवाय ''मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यापूर्वी आयोग, समित्या झाल्या. त्यांनी मात्र एकच सांगितले की मराठ्यांचे पुरावे नाहीत. त्यामुळे आरक्षण देता येत नाही. आता समितीने पुरावे शोधायला सुरुवात केली असून, ७० वर्षांपासूनचे पुरावे निघाले. १८०५ पासून १९६७ पर्यंत आणि १९६७ पासून २००३ पर्यंत लाखो मराठ्यांचे पुरावे सापडले आहेत. यातून मराठा आरक्षणाच्या ५० टक्क्यांत आहे. मराठा ओबीसी आहे, हे आता सिद्ध झाले आहे. ओबीसींच्या किंवा कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी जे काही निकष लागतात, ते सर्व मराठा समाजाने पूर्ण केले आहेत,'' असा दावाही जरांगे पाटलांनी केला आहे.

Manoj Jarange Patil
Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, तब्बल 11 मंत्र्यांची दांडी ; काय आहे कारण ?

दरम्यान, सांगलीतील सभेत जोरदार घोषणाबाजी झाली. या वेळी कार्यकर्त्यांना शांत करताना जरांगे पाटलांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'सध्या मराठ्यांना चारही बाजून घेरले जात आहे. मात्र, आरक्षण घेण्याचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. लेकरांच्या हितासाठी तयारी करा. मुलांचे करिअर वाचवायचे असतील, तर सज्ज राहा. एकजुटीशिवाय आपल्याला पर्याय नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com