Prithviraj Chavan News : पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले? आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांवर संतापले...

Maratha reservation : मी मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले.
Eknath Shinde, Ajit Pawar, Prithviraj Chavan
Eknath Shinde, Ajit Pawar, Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Sangli : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याबाबत निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला ओबीसी, कुणबी समाजाने विरोध केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

"मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले आहे का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदेंना केला आहे. सांगलीमध्ये काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत ते माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतला असल्याची टीका चव्हाणांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांंनी केलेल्या टीकेला चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar, Prithviraj Chavan
Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुणबी सेनाप्रमुखांना जिवे मारण्याची धमकी

अजितदादांना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसतोय...

"पृथ्वीराज चव्हाणदेखील दिल्लीतून आले आहेत, मग त्यांनी आरक्षण का दिले नाही," अशी टीका अजितदादांनी चव्हाणांवर केली होती. त्याला चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले आहे. "आज अजितदादांना पक्षांतरामुळे विसर पडलेला दिसतोय. मी मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले आणि त्यावेळी ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते," असे चव्हाण म्हणाले. "आता दिल्लीमध्ये पण भाजप सरकार आणि महाराष्ट्रातदेखील भाजप सरकार आहे. त्यामुळे भाजपने आता हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

Eknath Shinde, Ajit Pawar, Prithviraj Chavan
IAS in Big Tender : ९० कोटी रुपयांच्या `या` टेंडरमध्ये कोण मंत्री ? काेणत्या ‘आयएएस’चा इंटरेस्ट ?

हा कोणता न्याय?

"ज्यांच्याकडे निजामकालीन कागदपत्र, दाखले, पुरावे आहेत, त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे अन् ज्यांच्याकडे पुरावे नाहीत अशा गरीब लोकांचे काय? त्यांना राहायला घर नाही ते पुरावा कुठे सांभाळणार? अशा पद्धतीने आता मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग सरकारने केलेले आहेत. आज सरकार निजामकालीन कागदपत्रे, पुरावे, दाखले ग्राह्य धरीत आहेत. पण शाहू महाराजांच्या काळातील दाखले सरकार ग्राह्य का धरत नाहीत? हा कोणता न्याय आहे," असे म्हणत चव्हाणांनी यावर आक्षेप घेतला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com