
पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.
सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले.
तब्बल सहा दावेदार जिल्हाध्यक्ष पदासाठी मैदानात उतरले आहेत.
काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी हे पद ज्येष्ठ माजी नगरसेवकाकडे जाईल असे संकेत दिले.
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
Sangli News : स्थानिकच्या तोंडावर भाजपने काँग्रेसला मोठं खिंडार पाडले असून दोन कट्टर काँग्रेसच्या नेत्यांना फोडलं आहे. दोन महिन्यातच जयश्री पाटील आणि जिल्हाध्यक्ष असणाऱ्या पृथ्वीराज पाटलांचा पक्ष प्रवेश करून घेतला आहे. यानंतर आता जिल्हा काँग्रेसअंतर्गत संघटना बदलाचे वारे वाहू लागले असून यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आता रस्सीखेच सुरू झाली आहे. तब्बल सहा जणांनी शड्डू ठोकला असून काँग्रेस नेतृत्वापुढे नवे आव्हान उभे झाले आहे. यादरम्यान आगामी स्थानिकच्या आधीच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदाची धूरा ज्येष्ठ माजी नगरसेवकाच्या हातात दिली जाईल असे संकेत दिले आहेत. यामुळे आता नवा जिल्हाध्यक्ष कोण असणार? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
भाजपने सांगली जिल्ह्यात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसला लक्ष केले आहे. दोन महिन्यात महापालिकेत सर्वात मोठा गट असणाऱ्या मदन पाटील गटाच्या प्रमुख जयश्री पाटील यांना फोडले. त्या पाठोपाठ त्यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या जिल्हाध्य पृथ्वीराज पाटील यांनाही पक्षात घेऊन आगामी स्थानिकच्या महाविकास आघाडीच्या समोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.
दरम्यान रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तब्बल सहा जणांनी जिल्हाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. यामुळे काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. याचदरम्यान आता विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवकाची निवड केली जाईल, असे संकेत दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच निवड प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांशी आज (ता.3) विश्वजित कदम यांच्याशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी कदम म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. हरकत नाही, इच्छा प्रत्येकाने व्यक्त केली पाहिजे. परंतु, आपण त्या पदाला न्याय देऊ शकतो का? आपली तेवढी क्षमता आहे का? आपला तिन्ही शहरांचा तेवढा अभ्यास आहे का? महापालिका क्षेत्राबद्दल जाण किती आहे? महापालिकेतील निधी वाटपासह जे काही महत्त्वाचे विषय असतात ते रेटायला, त्या प्रकरणी भांडायला आणि त्यातील विषय लोकांसमोर मांडायला आपणास जमणार आहे का? हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्याला हे सारे जमेल, अशा व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल. ज्येष्ठता पाहिली जाईल. कारण, ही वेळ काम दाखवण्याची आहे. काँग्रेस पुन्हा तळागाळात नेण्याची आहे.
यावेळी खासदार विशाल पाटील यांनी इच्छुकांनी एक कामगिरी सोपवली. ते म्हणाले, ‘‘मनपाच्या प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत, त्यावरील हरकतींबाबत काम सुरू करा. ज्याला शहराध्यक्ष व्हायचे आहे, त्याने काँग्रेस कमिटीत अधिकाधिक वेळ द्यावा. तो वेळ अधिक देईल, त्याचा दावा मजबूत होईल.’’ दरम्यान, या पदासाठी इच्छुक अय्याज नायकवडी, राजेश नाईक, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, मयूर पाटील आदींनी यावेळी आपली मते मांडली. कुणालाही संधी द्या, मात्र निवड प्रक्रिया लवकर राबवून काम सुरू झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रश्न 1: काँग्रेसमधून कोण भाजपात गेले?
➡️ पृथ्वीराज पाटील.
प्रश्न 2: काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद का रिक्त झाले?
➡️ कारण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश केला.
प्रश्न 3: किती दावेदार जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे आले आहेत?
➡️ तब्बल सहा जण.
प्रश्न 4: विश्वजीत कदम यांनी काय संकेत दिले?
➡️ जिल्हाध्यक्ष पद ज्येष्ठ माजी नगरसेवकाला दिले जाईल.
प्रश्न 5: या घटनेचा स्थानिक निवडणुकांवर काय परिणाम होईल?
➡️ काँग्रेस नेतृत्व संकटात येईल आणि भाजपचा प्रभाव वाढेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.