
3 महत्वाचे मुद्दे (Summary)
शक्तिपीठ महामार्गावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप: शेतकऱ्यांनी सातबाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजप-शिवसेना नेत्यांवर बंदुकीखाली दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला.
गोकुळ व केडीसीसी बाबत सत्ताधाऱ्यांवर टीका: गोकुळ व केडीसीसीच्या व्याप्ती वाढीचा दाखला देत पाटील यांनी संचालक वाढीचे समर्थन केले व महायुतीवर "तूझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना" असा उपरोधिक टोलाही लगावला.
काँग्रेस वाद आणि इतर नेत्यांवर टोले: राहुल पाटील यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या चर्चांवर सतेज पाटील यांनी तोडगा शोधण्याचे आश्वासन दिले; महाडिक यांची टीका करत राजकारणात पैशांचा शिरकाव कोणी केला याचा इतिहास तपासण्याचे आवाहन केले.
Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी सातबारा सहित कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. "राजेश क्षीरसागर आणि शिवाजी पाटलांच्या डोक्यावर बंदूक आहे, आंदोलन करा, पाठिंबा द्या. आमदार राजेश क्षीरसागर यांना खासगीत विचारा , ते सांगतील शक्तीपीठाची गरज आहे का नाही? असे सतेज पाटील म्हणाले.
वरिष्ठांकडून आदेश आल्याने त्या बिचाऱ्याला दुसरा पर्याय नाही. जर शेतकऱ्यांचा विरोध नाही तर मग एवढ्या हरकती कशा आल्या, असा सवाल काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात केला. गोकुळ दूध संघाची उलाढाल चार हजार कोटींवर गेली आहे.
व्याप्ती वाढलेली आहे. केडीसीसीमध्ये संचालक वाढीचा निर्णय घेतल्याने ठेवी आणि व्याप्ती वाढली. गोकूळ चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी संचालक वाढीच्या निर्णायाची मदत होईल. तू माझं जमेना , तुझ्याशिवाय करमेना अशी अवस्था महायुतीची झाली आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
त्यांनी नीट माहिती घ्यावी, त्यामध्ये शेतकरी किती आहेत? मोबदला विषय वेगळा, त्याची आमच्यापुढे चर्चाच नाही. सहापट रक्कम मागण्यामागचं कारण त्यांच्या डोक्यावर ही बंदूक असणार, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.
काँग्रेसचे राहुल पाटील आणि त्यांचे बंधू मला उद्या भेटणार आहेत. काँग्रेस म्हणून पी.एन.पाटीलांनी आपली हयात काँग्रेसमध्ये काढली आहे. करवीर मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. राहूल पाटील काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
25 वर्ष नरके गट आणि पी.एन.पाटील गटांची भांडण आहेत. ते काँग्रेस सोडून जावू नये, यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. महाडिक साहेबांनी गोकूळ संदर्भात टोकणचं वक्तव्य करणं म्हणजे विनोद आहे. त्यांनी आजपर्यंत काय राजकारण केलं? पूर्वी संघटनात्मक राजकारण होतं. ताकदीचं ,पक्षाचं राजकारण होतं, याला खिळ कोणी बसवली? कोल्हापूर जिल्ह्यात पैशाचं राजकारण कोणी आणलं ,कोणी सुरू केलं याचा इतिहास त्यांनी तपासावा, असा आमदार पाटील यांनी लगावला.
प्रश्न: सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गावर कोणाचा दबाव असल्याचे म्हटले?
उत्तर: त्यांनी राजेश क्षीरसागर आणि शिवाजी पाटलांवर बंदुकीखाली दबाव असल्याचा आरोप केला.
प्रश्न: गोकुळ आणि केडीसीसी बाबत सतेज पाटील यांचे मत काय होते?
उत्तर: त्यांनी संचालकवाढीचे समर्थन करत गोकुळच्या व्याप्ती वाढीचे स्वागत केले.
प्रश्न: काँग्रेस नेते राहुल पाटीलबद्दल सतेज पाटील काय म्हणाले?
उत्तर: राहुल पाटील काँग्रेस सोडणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रश्न: सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यावर कोणती टीका केली?
उत्तर: त्यांनी महाडिक यांचे वक्तव्य विनोदी म्हणत, पैशाच्या राजकारणाचा इतिहास तपासावा असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.