
जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा असून, आमदार सुधीर गाडगीळ यांनी संकेत दिले आहेत.
सांगलीतील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रभाव वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
Sangli News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपमध्ये सांगलीत मोठे पक्ष प्रवेश होताना दिसत आहे. जयश्री पाटील यांचा प्रवेश भाजपमध्ये झाल्यानंतर काँग्रेसला गळती लागली असून भाजप आता दुसरा धक्का देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आले आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी देखील पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यास आम्हाला आनंद होईल असे वक्तव्य केलं आहे. यामुळे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश आता नक्की मानला जात आहे.
काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसला गळती लागेल अशा चर्चा सुरू होत्या. ज्या काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी धुडवात काँग्रेस मजबूत आहे असे म्हटले होते. तर जयश्रीताई का गेल्या याचे कारण सांगत त्यांच्यावर टीका केली होती. ज्याला भाजपकडून आणि मदन पाटील गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. सांगलीत हे राजकीय नाट्य सुरू असतानाच आता आरोप करणारेच पृथ्वीराज पाटील भाजपच्या वाटेवर असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
दरम्यान पृथ्वीराज पाटील यांची भेट घेऊन आमदार विश्वजीत कदम यांनी समजूत काढली होती. यानंतर ते काँग्रेसमध्येच थांबतील असे बोलले जात होते. अशातच आता पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये घ्यायचे की नाही, याचा निर्णय वरिष्ठ घेतील. त्यांच्या प्रवेशाचा निर्णय पक्षाने घेतला तर त्यांचे स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, सांगलीत भाजपमध्ये कोणाला प्रवेश देत असताना मला, तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेतले जाते. त्याबाबत चर्चा होते. मात्र कुणाला पक्षात घ्यायचे की नाही. याचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतात. त्यांनी निर्णय घेतला तर पाटील यांचे पक्षात स्वागतच करतो. पाटील यांच्या बाबतीत पक्षाने निर्णय घेतला तर त्यांचेही स्वागत करू. मात्र त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असे म्हटलं आहे.
आमदार गाडगीळ यांच्या विरोधात गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसकडून लढणारे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काही महिन्यांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पाटील यांनीही मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांसह अन्य नेते, मंत्र्यांची भेट घेतली असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांचा भाजपप्रवेश दोनदा होता-होता थांबला. त्यांना भाजपमधीलच एका गटाचा विरोध असल्याची चर्चा आहे.
पृथ्वीराज पाटील यांनी, भाजप प्रवेशाच्या चर्चेसाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला होता. ज्यात मंत्री जयकुमार गोरे यांचा पुढाकार होता. मात्र यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या प्रवेशात ट्विस्ट आला. जयश्रीताई पाटील यांनीदेखील भाजपच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशाला विरोध केला. यामुळे पृथ्वीराज पाटील काँग्रेसमध्येच राहणार की नवा पर्याय शोधणार, त्यांचे भाजप प्रवेशाचे काय होणार, याबाबत पुन्हा एकदा सस्पेन्स तयार झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.