
Sushma Andhare Criticise BJP : आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपकडून विकासकामांची पेरणीही सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच महिन्याच्या आत दुसऱ्यांदा मुंबई दौरा केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील पुणे, मुंबईच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणुकांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि शाह यांचे दौरे वाढल्याची टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही पंतप्रधान मोदी, शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरुन निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे यांनी सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह भाजपवरही जोरदार टीका केली. अंधारे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. यामुळे भाजपकडून कंठघोष केला जात आहे.मात्र, मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा एखादा टू बीएचके फ्लॅट खरेदी करुन इथेच राहावं असा मिश्किल टोलाही सुषमा अंधारें(Sushma Andhare)नी यावेळी लगावला आहे.
यावेळी अंधारे यांनी महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार असल्याचं मोठं विधान केलं आहे. या प्रसंगी त्यांनी शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत असून येत्या निवडणुकीत त्यांना गुलाल मिळू न देण्याचा कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळेच पाटण मतदारसंघ मिळावा म्हणूवन प्रयत्न करणार आहे असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.
''गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का?''
गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही. तुम्ही आजोबांच्या नावाला काळिमा फासला. देसाई तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? अशी टीकाही अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाईंवर केली.
उद्धव ठाकरे हे रोखठोक...
शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांनी उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला हव्या होत्या असं विधान केलं होतं. यावर भाष्य करताना अंधारे म्हणाल्या, राज्यात 14 तारखेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात संधी मिळावी यासाठी शिरसाठ असं वक्तव्य करत आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे रोखठोक आहेत. आमच्या पोटात जे असते तेच ओठावर असते. संजूभाऊंनी उगाच रक्त आटवू नये असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.